शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:06 IST

सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते व भाजपाचे राज्यकर्ते यांच्यात काहीच फरक नाही. इंग्रजांप्रमाणेच देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

ठळक मुद्देभाजपाने घेतली आहे इंग्रज शासनकर्त्यांची जागा, सेवाग्राममधून सुरू होणार ‘मुक्तिसंग्राम’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते व भाजपाचे राज्यकर्ते यांच्यात काहीच फरक नाही. इंग्रजांप्रमाणेच देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथे होणारी काँग्रेसची बैठक, शांती पदयात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.विजय वडेट्टीवार, आ.यशोमती ठाकूर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक सेवाग्राम येथे होत आहे. महात्मा गांधी यांच्याच नेतृत्वात इंग्रज शासनाविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी १४ जुलै १९४२ रोजी सेवाग्राम येथूनच ‘भारत छोडो’चा नारा देण्यात आला होता. आजची देशातील स्थिती लक्षात घेता त्याच भूमीतून जनविरोधी सरकारविरोधात ‘मुक्तिसंग्राम’ सुरू करण्यात येईल, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. देश आज राजकीय, सामाजिक व आर्थिक संक्रमण काळातून जात आहे. इंग्रजांच्या शासन काळाप्रमाणे आज देशाची स्थिती आहे व राज्यकर्तेदेखील तशाच पद्धतीने वागत आहेत. इंग्रजांप्रमाणे देशातील आर्थिक स्रोतांना बाहेर पाठविले जात आहे, देशात फूट पाडली जात आहे, लोकतांत्रिक मूल्यांचे दमन होत आहे, काही मूठभर श्रीमंतांसाठी जनतेला दावणीला बांधण्यात येत आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधात आवाज उचलणाऱ्यांचे तोंड दाबण्यात येत आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी लावला.विचारधारांचा संघर्ष सुरू राहीलहिंसेच्या विचारधारेवर चालणाऱ्या सध्याच्या शासनकर्त्यांकडून महात्मा गांधी यांचे नाव समोर करण्यात येत आहे. मात्र गांधी यांचे संस्कार मनात उतरावे लागतात. केवळ दिखावा करून काहीच होत नाही. काँग्रेसची विचारधारा ही अहिंसेवर आधारित आहे. देशात विचारधारांचा हा संघर्ष सुरूच राहील, असे सुरजेवाला म्हणाले.संघ व पाकिस्तान एकमेकांना पूरकयावेळी रणदीप सुरजेवाला यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आदर असल्याचे मत व्यक्त केले. मात्र संघाची विचारधारा देश कधीच मान्य करणार नाही. पाकिस्तान व संघ दोघेही द्वेष पसरवितात, दोघेही हिंसेचे समर्थक आहे आणि फूट पाडण्यावर त्यांचा विश्वास आहे. अशा स्थितीत दोघेही एकमेकांना पूरक तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे प्रतिपादन रणदीप सुरजेवाला यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसSewagramसेवाग्राम