शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 21:47 IST

Nagpur News कर्नाटकप्रमाणेच नागपुरातही परिश्रम घेऊ व महापालिकेवर विजयी झेंडा फडकवू, असा दावा कार्यकर्ते दुणावलेल्या आत्मविश्वासाने करीत आहेत.

नागपूर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भाजपचे पानिपत केले. या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून जोमाने काम करण्यासाठी एकप्रकारे बळ मिळाले आहे. कर्नाटकप्रमाणेच नागपुरातही परिश्रम घेऊ व महापालिकेवर विजयी झेंडा फडकवू, असा दावा कार्यकर्ते दुणावलेल्या आत्मविश्वासाने करीत आहेत.

कर्नाटकचा निकाल काँग्रेसच्या बाजूने येईल, असा अंदाज विविध सर्वेक्षणात आधीच व्यक्त करण्यात आला होता. सकाळी सुरुवातीच्या निकालात भाजपने आघाडी घेतली असता काँग्रेस कार्यकर्ते हिरमुसले होते. मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकली काँग्रेसच्या जागा वाढू लागल्या व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिवात जीव आला. शहर काँग्रेसने देवडिया भवनात जल्लोष केला. काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे यांच्यातर्फे भांडे प्लॉट चौकात जल्लोष करण्यात आला. अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसिम खान यांच्या नेतृत्वात मोमिनपुरा चौकात फटाके फोडण्यात आले. उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात इतवारी परिसरात मिठाई वितरित करण्यात आली. एवढेच नव्हे तर शहरभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्ते फोन करून एकमेकांना शुभेच्छा देत होते.

राऊत, केदार, वडेट्टीवार, ठाकरेंचे योगदान

- कर्नाटक निवडणुकीसाठी माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार व आ. विकास ठाकरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करीत विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या नेत्यांना संबंधित मतदारसंघ जिंकण्यात यश आले. विजयात योगदान दिल्याबद्दल या काँग्रेस नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून चौफेर अभिनंदन होत आहे. हे नेते असेच एकोप्याने भाजप विरोधात लढले तर नागपूरसह विदर्भातही पुन्हा एकदा काँग्रेसचा दबदबा निर्माण होईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

गटबाजीचे ‘नाटक’ न करण्याचा धडा

- अंतर्गत गटबाजी सोडून काँग्रेस नेते एकत्र येत ताकदीने लढले तर काय होऊ शकते हे कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी यापासून आतातरी धडा घेतला व एकदिलाने काम केले तर महापालिकेवर विजयी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कार्यकर्ते निकालानंतर व्यक्त करीत होते.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक