शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२०२४ मध्ये सोशल मीडियावरही भाजपला टक्कर द्यावी लागेल : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 12:28 IST

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने राष्ट्रीय नवसंकल्प शिबिराचा रविवारी समारोप झाला.

ठळक मुद्देराष्ट्रीय नवसंकल्प शिबिराचा समारोप

नागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी १२ राज्यांत निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये कुठेच काँग्रेस येऊ नये म्हणजे लोकसभेची निवडणूक सोपी होईल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेस जनमानसात जाऊन काम करीलच; पण भाजपकडून होणाऱ्या अपप्रचाराला रोखण्यासाठी सोशल मीडियावरही टक्कर द्यावी लागेल. त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने राष्ट्रीय नवसंकल्प शिबिराचा रविवारी समारोप झाला. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, अ.भा. काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, प्रवक्ते पवन खेरा, सोशल मीडिया विभाग प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया वॉर स्थापन करून सोशल मीडिया विभागाचा विस्तार करण्याचा संकल्प नाना पटोले यांनी केला, तर सोशल मीडिया हे भाषण देण्याचे व्यासपीठ नसून आपसातील मतभेद विसरून एकजूट लढा देण्याचा मनोदय यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. देशात विविध समुदायांमध्ये फूट पाडणाऱ्या अराजक शक्तीला पायबंद घालण्यासाठी आमचे सोशल मीडिया सेल सक्षम असल्याचे पवन खेरा म्हणाले. तळागाळापर्यंत सोशल मीडियाचे महत्त्व पटवून देण्याची गरज रोहन गुप्ता यांनी व्यक्त केली. सत्याच्या लढ्यासाठी सर्वांची तुरुंगात जाण्याची तयारी असली पाहिजे, असे अलका लांबा म्हणाल्या.

शिबिराला राष्ट्रीय स्वयंसेवक हसिबा अमीन, नितीन अग्रवाल, रुचिरा चतुर्वेदी, विजयानंद पोल, ज्ञानेश्वर चव्हाण, बिलाल अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस