शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

काँग्रेस जातीपातीच्या राजकारणातून दहशत पसरवत आहे : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:49 IST

काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवून आयोजित भाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनात बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनाचे आयोजन

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवून आयोजित भाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनात बोलत होते.वैशालीनगर येथील मैदानावर झालेल्या या संमेलनात राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, अशोक मेंढे, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, घनश्याम कुकरेजा, सुनिल मित्रा, प्रभाकर येवले, नवनीत सिंह तुली, शिवनाथ पांडे, महेंद्र धनविजय उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या भरवशावरच २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांत विजय मिळाला होता व नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. यानंतर शहरात युद्धपातळीवर विकासकामांना सुरुवात झाली. ५५ महिन्यांत शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. समाजातील अंतिम व्यक्तीला लाभ पोहोचविला जात आहे. मात्र, काँंग्रेससह इतर विरोधी पक्ष जातीवादाला प्रोत्साहन देऊन असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत, असे गडकरी यांनी प्रतिपादन केले. निवडणुकांच्या काळात देशाच्या इतर भागातही प्रचारासाठी जावे लागणार आहे. अशा स्थितीत ‘पेजप्रमुख’ तसेच पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांवरच निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण