शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची हायकोर्टात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST

नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी केली आहे. यावर रविवारी उत्तर सादर करण्याचे आदेश देत, न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.

ठळक मुद्देपारदर्शकतेसाठी काय उपाय केले : उच्च न्यायालयाची आयोगाला विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी केली आहे. यावर रविवारी उत्तर सादर करण्याचे आदेश देत, न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.नागपूर लोकसभेतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले व काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. के. देशपांडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी प्रतिवाद्यांना भारतीय निवडणूक आयोगाने स्थापित केलेल्या दिशानिर्देशांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन करीत मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली. याचिकेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई व नागपूरच्या मुख्य निवडणूक निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनुसार २५ ते २८ मार्चदरम्यान ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी करीत असताना स्ट्राँग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे आढळून आले होते. ११ एप्रिलला होणारी निवडणूक लक्षात घेता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंबंधी असलेल्या दिशानिर्देशांचे कठोरपणे पालन व्हावे, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने, प्राथमिक दृष्ट्या निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे राबविण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय घेण्याचे कारण दिसत नसल्याचे सांगितले.याचिकाकर्त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची दुसऱ्या स्तराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. एक किंवा दोन प्रतिनिधींद्वारे मॉकड्रीलची तपासणी करणे शक्य नसल्याने, दुसऱ्या स्तराच्या मॉकड्रीलच्या वेळी किमान २० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मीनाक्षी अरोरा यांनी बाजू मांडली. त्यांच्यासोबत अ‍ॅड. आर.एस. अकबानी हे सहकारी होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेसnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019