शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरक्षणावरून काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारण करतेय

By admin | Updated: August 30, 2015 02:33 IST

मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांनी धनगर आरक्षणाला सत्तेत असताना विरोध केला..

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन : मराठा व धनगर आरक्षणासाठी एल्गारनागपूर : मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांनी धनगर आरक्षणाला सत्तेत असताना विरोध केला ते आज घोंगडे पांघरून आरक्षणाची मागणी करीत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा व धनगर समाजाचा उपयोग राजकारणासाठी करू पाहत आहेत, असा आरोप करीत त्यापासून सावध रहा, असे आवाहन महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचा १२ वा वर्धापन दिन देशपांडे सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी मराठा व धनगर समाज आरक्षणाचा आवाज बुलंद केला. जानकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते तर धनगर समाज आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष अजित पवार होते. राणेंनी त्यांच्या अहवालात मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली. मात्र, पवार यांनी त्यांच्या अहवालास धनगरांना आरक्षण देऊ नये, अशी नोट लिहिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीररीत्या धनगर आरक्षणाला विरोध केला होता. हे सर्व पाहिल्यावर आपण हक्कासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला व धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सत्तेच्या खाली खेचण्याचा निर्धार केला. मी सत्तेसाठी भाजपसोबत नाही तर, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजपसोबत आहे. ज्या दिवशी भाजपही काँग्रेस- राष्ट्रवादीप्रमाणे आरक्षणाचे भिजत घोंगडे ठेवत असल्याचे दिसन येईल त्या दिवशी मी सत्तेसोबत नाही तर समाजासोबत असेल, असेही जानकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील महायुतीचे सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. तसा सकारात्मक अहवाल सरकारने तयार केला असून तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सांगत वेळ लागेल पण आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला. गुजरातमध्ये आरक्षणासाठी पटेल एकत्र आले. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील मराठ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळवून दाखवावे, आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असा चिमटाही त्यांनी काढला. आ. विनायक मेटे म्हणाले, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेले कुणबी, मराठा, पाटील मराठा आरक्षणासाठी नेमही एकत्र येतात. पण सक्षम व सधन असलेले मराठे एकत्र येत नाही. धनगर व मराठा आरक्षण रखडल्याचे पाहून काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते या समाजाचा उपयोग राजकारणासाठी करू पाहत आहेत. मात्र, युती सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवेल व सर्वांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)