शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने 

By आनंद डेकाटे | Updated: March 7, 2024 19:03 IST

आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे.

नागपूर: आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. त्यांची ही भूमिकाच आघाडी होण्यासाठी घातच ठरते, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसपी)चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड. सुरेश माने यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत केले.

ड. माने म्हणाले, भाजप व संघ परिवार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यापूर्वीही आम्ही आघाडीसोबतच होतो. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आतापर्यंत तरी आमच्याशी साधी चर्चाही केलेली नाही. इतर छोट्या पक्षांसोबत सुद्धा त्यांची अशीच भूमिका असते. शेवटच्या घटकेत युती होणे हे योग्य राहत नाही. छोट्या पक्षांना निवडणुकीसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे हे आघाडीसाठी घातक ठरते.

येत्या १५ मार्च रोजी कांशीराम यांच्या जन्मदिनी पक्षातर्फे नागपुरातील इंदोरा मैदान येथे निवडणुक महासभा आयोजित करण्यात आली आहे. यासभेला राष्ट्रीय शोषित समाज पार्टीचे अध्यक्ष व माजी खासदार स्वामीप्रसाद मौर्य, आयएनएलचे प्रो. मोहम्मद सुलेमान, छोटूभाई वसावा, रामबक्श वर्मा, पृथ्वीराज,साहेबसिंह धनगड प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेत आपण निवडमुकीबाबतची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे, विश्रांती झामरे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.

खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही लिहून द्यावंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला (उद्धव ठाकरे) निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे लिहून द्यायला सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत एड. सुरेश माने यांनी खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्यायला काय हरकत आहे, असे म्हटले. दोघांनीही एकमेकांकडून असे लिहून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत वंचितची जी ताकद दिसून आली ती एमआयएमसोबत असल्यामुळे होती. महाविकास आघाडी वंचितला इतके महत्व देत आहे, त्याचे काय होते, ते लवकरच समजेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर