शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने 

By आनंद डेकाटे | Updated: March 7, 2024 19:03 IST

आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे.

नागपूर: आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. त्यांची ही भूमिकाच आघाडी होण्यासाठी घातच ठरते, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसपी)चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड. सुरेश माने यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत केले.

ड. माने म्हणाले, भाजप व संघ परिवार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यापूर्वीही आम्ही आघाडीसोबतच होतो. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आतापर्यंत तरी आमच्याशी साधी चर्चाही केलेली नाही. इतर छोट्या पक्षांसोबत सुद्धा त्यांची अशीच भूमिका असते. शेवटच्या घटकेत युती होणे हे योग्य राहत नाही. छोट्या पक्षांना निवडणुकीसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे हे आघाडीसाठी घातक ठरते.

येत्या १५ मार्च रोजी कांशीराम यांच्या जन्मदिनी पक्षातर्फे नागपुरातील इंदोरा मैदान येथे निवडणुक महासभा आयोजित करण्यात आली आहे. यासभेला राष्ट्रीय शोषित समाज पार्टीचे अध्यक्ष व माजी खासदार स्वामीप्रसाद मौर्य, आयएनएलचे प्रो. मोहम्मद सुलेमान, छोटूभाई वसावा, रामबक्श वर्मा, पृथ्वीराज,साहेबसिंह धनगड प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेत आपण निवडमुकीबाबतची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे, विश्रांती झामरे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.

खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही लिहून द्यावंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला (उद्धव ठाकरे) निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे लिहून द्यायला सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत एड. सुरेश माने यांनी खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्यायला काय हरकत आहे, असे म्हटले. दोघांनीही एकमेकांकडून असे लिहून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत वंचितची जी ताकद दिसून आली ती एमआयएमसोबत असल्यामुळे होती. महाविकास आघाडी वंचितला इतके महत्व देत आहे, त्याचे काय होते, ते लवकरच समजेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर