शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

खासदार नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसच्या इशाऱ्यावर; भाजपा नेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 10:00 IST

भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

ठळक मुद्देपक्षाला फरक पडणार नसल्याचा दावास्वागतासाठी पोहचले काँग्रेसजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपा आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. गुजरात निवडणुकीत याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने त्यांना जाळ्त ओढण्याचे डावपेच आखले आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्यमंत्री सुधाकर देशमुख यांच्यासह भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, चंदन गोस्वामी, देवेंद्र दस्तुरे आदींनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्या भूमिकेवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असून राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर नाना पटोले यांनी टीका केली होती. यावर देशमुख म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची मदत न घेता राज्यात ३४ हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. यापैकी ४१ लाख शेतकºयांना १९ हजार कोटींचे वितरण झाले असून उर्वरित रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उलट २००८ ला केंद्रातील काँग्रेस सरकारने केलेल्या ७० हजार कोटींच्या कर्जमाफीचा विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी हे खासदारांचे ऐकत नाही व त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकून घेतला नाही असाही आरोप केला होता. यावर देशमुख म्हणाले, भाजपामध्ये अंतर्गत लोकशाही असून नेत्यांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. तेथे पटोले यांनी भूमिका मांडायला हवी होती. उलट या काळात त्यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचे आरोप आणि राजीनामा म्हणजे काँग्रेसच्या इशाऱ्यावर चाललेले राजकीय डावपेच असल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

पटोलेंना स्थानिक पातळीवर विरोधगेल्या काही महिन्यांपासून पटोले हे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने भंडारा, गोंदियाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना कुणाचेही समर्थन नाही. या काळात देशात आणि राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या कामगिरीवर जनता खूश आहे. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही.नागपुरात रात्री ९ वाजता आगमनभाजपावर नाराज असलेले नाना पटोले हे खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकल्याने सुखावलेल्या काँग्रेसच्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहचून पटोले यांचे स्वागत केले. तर, पक्षाकडून अद्याप कुठलेच दिशानिर्देश न आल्यामुळे काहींनी दूर राहणेच पसंत केले.पटोले यांचे रात्री ९ वाजता विमानतळावर आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. भंडारा,गोंदियासह नागपुरातहूनही त्यांचे समर्थक पोहचले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके, नितीन कुंभलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठेही पोहचले. त्यांनी पटोले यांचे स्वागत केले. शेळके यांनी वाराणसीहून आणलेले गंगाजल पटोले यांना देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली. पटोले यांनी ११ डिसेंबर रोजी गुजरात येथे राहुल गांधी यांच्यासोबत प्रचार सभेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील का, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. पटोले यांचा काँग्रेसप्रवेश अधिकृतपणे व्हायचा असल्यामुळे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जाणे टाळले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठलाही संदेश आलेला नाही. अशापरिस्थितीत स्वागतासाठी जाणे योग्य राहील का, असा प्रश्न काही नेत्यांना पडला. पुढे गुंता वाढू नये म्हणून या नेत्यांनी पटोलेंच्या भेटीसाठी जाणे टाळले.विमानतळावर किसान विकास आघाडीचे प्रशांत पवार, मिलिंद महादेवकर, गणेश साबणे, शेखर शिरभाते, उमेश डांगे, विनोद पडोळे, रवींद इटकेलवार आदींनी पटोलेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत स्वागत केले. पटोले आज, शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. याकडे भाजपासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले