शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:45 IST

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे समन्वयक किशोर गजभिये व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआजपासून दोन दिवस समिती नागपुरात

नागपूर : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे समन्वयक किशोर गजभिये व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.अ.भा. काँग्रेस कमिटीने माजी अर्थमंत्री खासदार पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षेत व खा. प्रा. राजीव गौडा यांच्या समन्वयात जाहिरनामा समिती तयार केली आहे. ही समिती देशभरात थेट जनतेपर्यंत पोहचून त्यांच्याशी सल्लामसलत करणार आहे. यासाठी समितीने पथके तयार केली असून ही पथके विविध भागात जाऊन जनतेशी विचारविनिमय करणार आहेत. ही समिती अन्न सुरक्षा व पोषण, आरोग्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग या पाच बिंदूवर ही सल्लामसलत करणार आहे. याअंतर्गत २९ व ३० आॅक्टोबर रोजी नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पथकामध्ये प्रा. गौडा यांच्यासह के.राजू, ताम्रध्वज साहू, बिंदू क्रिष्णा, रघुवीर मीना यांचा समावेश असणार आहे. समन्वयक म्हणून पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, डॉ. अमोल देशमुख यांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेरीटेज लॉन, सदर येथे होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र व बाहेरील स्वयंसेवी संस्था, संशोधक, पत्रकार, अभ्यासक, संघटनांचे कार्यकर्ते, प्राध्यापक, समाजसेवक आदींशी संवाद साधून विचार विनिमय, सूचना, माहिती व सामग्रीचे योगदान मागविले जात असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत अनिल नगरारे, त्रिशरण शहारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण