शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेत्यांमध्ये दुरावा, कार्यकर्ते अस्वस्थ

By admin | Updated: July 10, 2017 01:26 IST

जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण रणजित देशमुख, सुनील केदार, राजेंद्र मुळक व नाना गावंडे या चार नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत आले आहे.

नेते ‘गट’ सांभाळण्यात खूश : मंचावर एकत्र, उतरताच वेगळ्या दिशालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण रणजित देशमुख, सुनील केदार, राजेंद्र मुळक व नाना गावंडे या चार नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत आले आहे. रणजितबाबूंच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे व आशिष देशमुखांनी भाजपची वाट धरल्यामुळे देशमुखांचा काँग्रेसमधील जोर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत उरलेल्या तीन नेत्यांना एकत्र येत भाजपा विरोधात एक मोठी ताकद उभारण्याची संधी आहे. मात्र, हे नेते पक्षाच्या कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मनभेदांमुळे यांच्यातील अंतर्गत दुरावा वाढत चालला आहे. यामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता कमालीचा अस्वस्थ आहे. भाजपाने लोकसभा, विधानसभा, नगर परिषद व महापालिकेचीही निवडणूक लागोपाठ जिंकली. आता नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूकही भाजपाने तेवढीच सिरियसली घेतली नाही. मात्र, राज्यभर काँग्रेसचा पराभव होत असताना जिल्ह्यातील काँग्रेस नेते एकत्र येऊन विजयाची रणनीती आखण्यापेक्षा आपले ‘गट’ सांभाळण्यातच खूश दिसत आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीच्यावेळी पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव समोर येताच आ. सुनील केदार यांच्या समर्थकांकडून विरोध झाला होता. केदार गटाने नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर केले होते. जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत या देखील इच्छुक होत्या. शेवटी मुळक यांची वर्णी लागली.मुळक यांच्या पदग्रहण सोहळ्यात केदारांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली होती. जिल्हाध्यक्षपद गेल्यानंतर सुनीता गावंडे यादेखील फारशा सक्रिय दिसत नाहीत. बैठकांना त्या उपस्थित असतात. मात्र, त्यांनी पुढाकार घेऊन एखादे मोठे आंदोलन केल्याचे पहायला मिळाले नाही. ज्येष्ठ नेते नाना गावंडे हे देखील तेव्हापासून कमालीचे शांत आहेत. माजी केंद्रीय सुबोध मोहिते यांनी शिवसेना सोडून काँग्रेसचा हात धरला होता. पक्षाने त्यांना रामटेक लोकसभा व विधानसभेतही संधी दिली. मात्र, मोहिते विजयी झाले नाही. पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे आपला पराभव झाला, असे मोहिते उघडपणे सांगत होते. शेवटी मोहिते यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडली व शिवसंग्राममध्ये दाखल झाले. काँग्रेसने आपल्याला डम्प करून ठेवले होते, असा घणाघात त्यांनी पक्ष सोडताना केला. माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी विधानसभेची गेली निवडणूक रामटेकमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. पराभवानंतर दीड वर्षांनी ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र, त्यांनाही पक्षात अजून ‘फ्री हॅण्ड’ मिळालेला नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या दडपणाखालीच त्यांना काम करावे लागत आहे. माजी आमदार आनंदराव देशमुख, देवराव रडके हे पक्षाच्या बैठकांना नियमित उपस्थित असतात. मात्र, सक्रिय असलेले नेते या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकतातच असे नाही. कुंदा राऊत यांची आंदोलनासाठी धडपड सुरू असते. पण ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना पाहिजे तसे पाठबळ मिळताना दिसत नाही. कार्यकर्त्यांना ‘गटा’च्या दोरीने जखडले काँग्रेसकडे सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, मुजीब पठाण, नाना कंभाले, बाबा आष्टनकर, हर्षवर्धन निकोसे, सुरेश कुमरे, मनोहर कुंभारे, प्रकाश वसू, उपासराव भुते, शांता कुमरे, शिवकुमार यादव, मनोज तितरमारे, अरुण हटवार, कुंदा राऊत, प्रणिता कडू, तक्षशिला वाघधरे अशी जिल्हाभर मोठी टीम आहे. सक्रिय महिला कार्यकर्त्याची कमी नाही. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी या टीममधील बहुतांश जणांना ‘गटा’च्या दोरीने बांधून ठेवले आहे. जे मोकळे आहेत त्यांना जवळ घ्यायला, त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवायला कुणी तयार नाही. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिगत निष्ठा पाहून दुसऱ्या फळीतील नेत्यांना ‘आधार’ दिला जात आहे. यामुळे काँग्रेस बळकट होण्याऐवजी कमजोर होण्याचा धोका वाढला आहे. शेतकरी आंदोलनातही काँग्रेस नेते मागे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता. हे लोण राज्यभर पसरले असताना नागपूर जिल्ह्यात साधी ठिणगीही पडली नव्हती. सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची आयती संधी काँग्रेसकडे चालून आली होती. मात्र, जिल्हातील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत संयुक्तरीत्या एकही मोठे आंदोलन केले नाही. रस्ता रोको केला नाही. नागपूर जिल्ह्यात एकतर संकटग्रस्त शेतकरीच नाहीत किंवा काँग्रेसच उरली नाही, असेच चित्र पहायला मिळाले.