शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

"काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना खाेटे बाेलण्याची सवय लागली" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

By आनंद डेकाटे | Updated: June 7, 2025 18:01 IST

Nagpur : ठाकरे भावांपेक्षा माध्यमांमध्येच उत्कटता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारी बाबत घेण्यात आलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारी सह प्रमाण दिले आहे. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. ते खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दैनिक लोकमतमध्ये शनिवारी छापून आलेल्या राहुल गांधी यांच्या लेखावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मत घोटाळ्यावर भाष्य केले होते. राहुल गांधी यांच्या लेखाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. पण राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःशीच खोट बोलणे सोडणार नाही, खोटे आश्वासनाने दिलासा देण्याचे सोडणार नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही, त्यांना जागे व्हावे लागेल, वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते ऐकणाऱ्या समजत नाही.

रोज खोटे बोलले की लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात. यापूर्वी देखील त्यांनी असा आरोप केलेला आहे. आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान राहुल गांधी करत आहे, असेही फडणवीस म्हणाले

ठाकरे भावांपेक्षा माध्यमांमध्येच उत्कटतामुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चाना ऊधान आले आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले. जेवढी उत्कटता या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांमध्ये दिसत आहे. तेवढी दोन्ही भावांमध्ये दिसत नाही आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरRahul Gandhiराहुल गांधी