शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी १९० जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:32 IST

सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहासचिव अविनाश पांडे यांचा दावा : राजस्थानच्या सर्व जागांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी केला आहे.अविनाश पांडे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता २०१४ च्या निवडणुकीपेक्षा खूप घसरली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ‘एअर स्ट्राईक’ कारवाईचे ज्या प्रकारे राजकारण करण्यात आले, ते नागरिकांना आवडलेले नाही. भाजपा मुख्य मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे, यात ते यशस्वी होणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालाने हिंदी भाषिक राज्यातील नागरिक काय विचार करीत आहेत, ते दिसून आले आहे. ते ज्या राजस्थानचे प्रभारी आहेत, तेथील सर्व २५ जागांवर काँग्रेसची नजर आहे. येथे काँग्रेस २० पेक्षा अधिक जागा जिंकेल. इतर पक्षांच्या मदतीने काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करण्यास यशस्वी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारपांडे म्हणाले, उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारे असतील. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या खूप मेहनत घेत आहेत. त्यांची मेहनत निश्चितच फळास येईल. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढेल. भाजपला तिथे मोठे नुकसान होईल. व्यापारी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आदी समाज भाजपावर नाराज आहे. निवडणुकीत याचा परिणाम निश्चित दिसून येईल.महाराष्ट्रातही युतीला मातनागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत काट्याची होईल. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भाजप-शिवसेनेला मात देईल, असा दावाही त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAvinash Pandeyअविनाश पांडे