शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:32 IST

इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठळक मुद्देउत्तर नागपुरातील सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी उत्तर नागपुरात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला आ. डॉ. मिलिंद माने, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, वीरेंद्र कुकरेजा, डॉ. विंकी रुगवानी, राजन वाघमारे, बाळू घरडे, नवनीतसिंग तुली आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना ते म्हणायचे की मी दिल्लीतून एक रुपया पाठवायचो तर १५ पैसे जनतेला भेटायचे. पण भाजपाच्या सरकारने डीबीटी योजना सुरू करून, ८० हजार कोटी रुपयांच्या योजनेचा पूर्णपणे लाभ जनतेला मिळाला. उज्ज्वला योजनेतून गॅस, उजाला योजनेतून वीज, पंतप्रधान आवास योजनेतून घर गरिबांना भाजप सरकारने दिले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात ९८ टक्के शौचालय बांधण्यात आली. मुद्रा योजनेच्या माध्यमातून १२ कोटी लोकांना विनातारण कर्ज उपलब्ध झाले. याचा खऱ्या अर्थाने लाभ गरीब जनतेला झाला. काँग्रेसने बाबासाहेबांच्या नावावर राजकारण केले, सत्ता मिळविली. पण चैत्यभूमीजवळील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा काँग्रेसने दिली नाही. भाजपाच्या सरकारने अवघ्या तीन दिवसात ३४०० कोटी रुपयांची इंदू मिलची जागा स्मारकाला दिली. अलीपूरचे घर बाबासाहेबांचे स्मारक बनले, लंडनमधील बाबासाहेबांचे घर खरेदी केले. त्याचबरोबर अनुसूचित जातीचे आरक्षण, पदोन्नती, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अडचणीत आला त्यावेळी आमच्या सरकारने समाजाचे प्रोटेक्शन केले. सामाजिक न्याय हा भाषणात मांडायचा नसतो, तो आपल्या कर्तृत्वात असावा लागतो. भाजपाने सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणूक आली की काँग्रेसवाले आरोप करतात की संविधान बदलतील, आरक्षण संपवतील, पण बाबासाहेबाचे संविधान इतके मजबूत आहे की, ते कुणीही बदलवू शकत नाही.एअर स्टाईकसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एअर स्ट्राईकसंदर्भात जगात दोघांनाच शंका आहे. एक पाकिस्तान आणि दुसरी काँग्रेस. हल्ले झाले हे मोदींनी नाही सांगितले, ते सेनेच्या प्रमुखांनी सांगितले. पण काँग्रेसला सेनेच्या लोकांवरही भरवसा नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.राजकारण हे समाजसेवेचे माध्यम : नितीन गडकरीराजकारण हे केवळ सत्ताकारण नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे ,असा माझा विश्वास आहे. म्हणूनच गोरगरीब वंचितांच्या समस्यांना जो आपले मानतो आणि पोटतिडकीने यांच्या समस्या सोडवितो त्यालाच जनता स्वीकारते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वसंतनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, समाजामध्ये अनेक समस्या आहेत, पण या समस्यांची जाण असणारी माणसे मात्र दुर्दैवाने कमी आहेत. मी ज्या संस्कारात आणि परिवारात वाढलो, ज्या पक्षाने आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केले, त्या अनेक जिव्हाळ्याच्या माणसांमुळे मी लोककल्याणकारी कामे करू शकलो. त्यामुळे आपल्याला चिंता नसून नागपूरच्या जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुधाकर कोहळे, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. मोहन मते, किशोर कुमेरिया, रमेश सिंगारे, विशाखा बांते, भारती बुंडे, वंदना भगत आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस