शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफाया

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने

पाचही जागा भाजपाकडे : मुलाचे डिपॉझिट वाचविण्यातही अपयश यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. एवढेच नव्हे तर माणिकरावांना आपल्या मुलाचे डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वाधिक दैनावस्था काँग्रेसची झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे मनोहरराव नाईक (पुसद) आणि संजय राठोड (दिग्रस) यांच्या रुपाने आपल्या जागा कायम राखल्या. संजय राठोड यांची मतांची आघाडी राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. हे दोनही उमेदवार मताधिक्याने निवडून आले. संजय राठोड यांनी आपली विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर यवतमाळचे भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांना निसटता विजय प्राप्त करता आला. त्यांना शिवसेनेचे सामान्य उमेदवार संतोष ढवळे यांनी जबर टक्कर दिली. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार अनपेक्षितरीत्या निवडून आले. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार या दिग्गजांसह उमरखेडचे आमदार विजय खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुरके तब्बल ४० हजार मतांनी पराभूत झाले. जिल्ह्यातील भाजपाचे चार उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. पक्षाच्या दृष्टीने ते नवे चेहरे ठरले आहे. जिल्ह्यात नरेंद्र मोदींची सभा झालेली नसताना भाजपाने तब्बल पाच जागा मिळविणे हे मोठे यश मानले जात आहे. भाजपा व राष्ट्रवादीतून ऐनवेळी शिवसेनेत उडी मारणाऱ्या दोन उमेदवारांना मतदारांनी नाकारले. (जिल्हा प्रतिनिधी)पुत्र राहुल ठाकरे चौथ्या क्रमांकावरमाणिकराव ठाकरे यांना किमान आपल्या गृहजिल्ह्यातही काँग्रेस वाचविता आली नाही. माणिकरावांनी यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून ते मुलगा राहुल ठाकरे यांना बहाल केले. सर्वांचा विरोध पत्करुन आणि ऐनवेळी पद सोडण्याची धमकी देऊन माणिकरावांनी मुलासाठी तिकीट आणले असली तरी त्यांना त्याला विजयी करता आलेले नाही. निवडणूक काळात माणिकरावांनी आपली संपूर्ण शक्ती यवतमाळात खर्च केली. त्यासाठी राज्यातील अन्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. मात्र त्यानंतरही यश आले नाही. राहुल ठाकरे तब्बल चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.