शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफाया

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने

पाचही जागा भाजपाकडे : मुलाचे डिपॉझिट वाचविण्यातही अपयश यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. एवढेच नव्हे तर माणिकरावांना आपल्या मुलाचे डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वाधिक दैनावस्था काँग्रेसची झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे मनोहरराव नाईक (पुसद) आणि संजय राठोड (दिग्रस) यांच्या रुपाने आपल्या जागा कायम राखल्या. संजय राठोड यांची मतांची आघाडी राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. हे दोनही उमेदवार मताधिक्याने निवडून आले. संजय राठोड यांनी आपली विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर यवतमाळचे भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांना निसटता विजय प्राप्त करता आला. त्यांना शिवसेनेचे सामान्य उमेदवार संतोष ढवळे यांनी जबर टक्कर दिली. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार अनपेक्षितरीत्या निवडून आले. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार या दिग्गजांसह उमरखेडचे आमदार विजय खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुरके तब्बल ४० हजार मतांनी पराभूत झाले. जिल्ह्यातील भाजपाचे चार उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. पक्षाच्या दृष्टीने ते नवे चेहरे ठरले आहे. जिल्ह्यात नरेंद्र मोदींची सभा झालेली नसताना भाजपाने तब्बल पाच जागा मिळविणे हे मोठे यश मानले जात आहे. भाजपा व राष्ट्रवादीतून ऐनवेळी शिवसेनेत उडी मारणाऱ्या दोन उमेदवारांना मतदारांनी नाकारले. (जिल्हा प्रतिनिधी)पुत्र राहुल ठाकरे चौथ्या क्रमांकावरमाणिकराव ठाकरे यांना किमान आपल्या गृहजिल्ह्यातही काँग्रेस वाचविता आली नाही. माणिकरावांनी यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून ते मुलगा राहुल ठाकरे यांना बहाल केले. सर्वांचा विरोध पत्करुन आणि ऐनवेळी पद सोडण्याची धमकी देऊन माणिकरावांनी मुलासाठी तिकीट आणले असली तरी त्यांना त्याला विजयी करता आलेले नाही. निवडणूक काळात माणिकरावांनी आपली संपूर्ण शक्ती यवतमाळात खर्च केली. त्यासाठी राज्यातील अन्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. मात्र त्यानंतरही यश आले नाही. राहुल ठाकरे तब्बल चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.