शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म कोरे की छापील ?

By admin | Updated: January 25, 2017 20:36 IST

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे होणा-या ‘ए-बी’ फॉर्म वितरणात बरेच घोटाळे झाल्याचा इतिहास आहे. उमेदवारांचे ‘ए-बी’ फॉर्म पळविण्यासाठी ते एकाच जागेसाठी दोन

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे होणा-या ‘ए-बी’ फॉर्म वितरणात बरेच घोटाळे झाल्याचा इतिहास आहे. उमेदवारांचे ‘ए-बी’ फॉर्म पळविण्यासाठी ते एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना फॉर्म देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे यावेळी प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांचे नाव छापलेले ‘ए-बी’ फॉर्म येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर ऐनवेळी एखाद्या उमेदवाराने लढण्यास असमर्थता व्यक्त केली तर पर्यायी उमेदवाराला दुसरा ‘ए-बी’ फॉर्म कुठून द्यायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. इच्छुक उमेदवारांनी मात्र आतापासूनच ‘ए-बी’ फॉर्मचे टेन्शन घेतले आहे.
 महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच काँग्रेसतर्फे उमेदवारांना ‘ए-बी’ फॉर्म देण्यात आल्याचा इतिहास आहे. २०१२ मध्ये काँग्रेसने मुदतीच्या दोन दिवसांपूर्वी ८० उउमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, दुसºयाच दिवशी या यादीतील २२ उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी प्रदेश काँग्रेसकडून कोरे ‘ए-बी’ फॉर्म आल्यामुळे बदललेल्या उमेदवारांना ते देणे शक्य झाले होते. या वेळीही तसा प्रकार घडू नये, ऐनवेळी कुणाची नावे कापून मर्जीतील उमेदवारांना फॉर्म दिले जावू नये म्हणून उमेदवाराचे नाव छापलेलेच ‘ए-बी’ फॉर्म प्रदेश काँग्रेसकडून देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
दुसरीकडे असे केल्याने काय धोका होऊ शकतो, ते ही भक्कमपणे मांडले जात आहे. उमेदवाराचे नाव छापलेले ‘ए-बी’ फॉर्म प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले व वेळेवर एखाद्या उमेदवाराने निवडणूक लढण्यास असमर्थता व्यक्त केली तर ऐनवेळी दुस-या उमेदवाराला देण्यासाठी ‘ए-बी’ फॉर्म उपलब्ध राहणार नाही. खोडतोड करून दुसरे नाव लिहिलेला ‘ए-बी’ फॉर्म स्वीकारला जात नाही. अशा परिस्थितीत संबंधित जागेवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार न राहण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसतर्फे कोरेच ‘ए-बी’ फॉर्म येतील, असा दावा काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या वेळी काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म वितरणात होणा-या घोळाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होते की सर्वकाही सुरळित पार पडते याकडे काँग्रेस जणांच्या नजरा लागल्या आहेत.