शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण...
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
4
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
5
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
6
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
7
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
8
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
9
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
10
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
11
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
12
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
13
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
14
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
15
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
16
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
17
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
18
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
19
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
20
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:33 IST

क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सरकारकडून सापळा रचून विरोधी गटांतील नेत्यांची शिकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’संदर्भात निवडणूक आयोगात दुमत आहे. देशात अशी स्थिती कधीही उद्भवली नव्हती. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवावे, आम्ही ‘ईव्हीएम’चा फोलपणा सिद्ध करून दाखवू. राज ठाकरे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील सहकार क्षेत्राचे वाटोळे झाले. सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढली. अशा स्थितीत आपले अपयश लपविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. याऐवजी सरकारने कामे केली असती तर अशी वेळच आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘अलीबाबा और चालीस चोर’ असे भाजपची नेतेमंडळी म्हणायची. आज त्यांच्या नेत्यांना सापळा रचून त्यांची शिकार करणे सुरू आहे. आता भाजपात आल्यानंतर त्यांच्यादृष्टीने ‘चोर’ असलेले लोक पवित्र झाले का, असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी केला.मिलिंद नार्वेकरांनी दिली सेनेत येण्याची ‘ऑफर’शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे व मी कधीही काँग्रेसशी गद्दारी करणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ‘वर्षा’तून एकही फोन आला नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMediaमाध्यमेEVM Machineएव्हीएम मशीन