शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:33 IST

क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सरकारकडून सापळा रचून विरोधी गटांतील नेत्यांची शिकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’संदर्भात निवडणूक आयोगात दुमत आहे. देशात अशी स्थिती कधीही उद्भवली नव्हती. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवावे, आम्ही ‘ईव्हीएम’चा फोलपणा सिद्ध करून दाखवू. राज ठाकरे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील सहकार क्षेत्राचे वाटोळे झाले. सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढली. अशा स्थितीत आपले अपयश लपविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. याऐवजी सरकारने कामे केली असती तर अशी वेळच आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘अलीबाबा और चालीस चोर’ असे भाजपची नेतेमंडळी म्हणायची. आज त्यांच्या नेत्यांना सापळा रचून त्यांची शिकार करणे सुरू आहे. आता भाजपात आल्यानंतर त्यांच्यादृष्टीने ‘चोर’ असलेले लोक पवित्र झाले का, असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी केला.मिलिंद नार्वेकरांनी दिली सेनेत येण्याची ‘ऑफर’शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे व मी कधीही काँग्रेसशी गद्दारी करणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ‘वर्षा’तून एकही फोन आला नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMediaमाध्यमेEVM Machineएव्हीएम मशीन