शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपापसात भांडणे हाच काँग्रेसचा ‘अजेंडा’

By admin | Updated: February 17, 2017 02:52 IST

कॉंग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका : दिवाळखोर बँकेसारखी पक्षाची अवस्थानागपूर : कॉंग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. आपापसांत भांडण करणे हाच कॉंग्रेसचा मुख्य ‘अजेंडा’ आहे. एखाद्या दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी कॉंग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. एकात्मता नगर, जयताळा व सुभाषनगर येथे आयोजित प्रचारसभांमध्ये त्यांनी गुरुवारी वरील वक्तव्य केले.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. कॉंग्रेसचे शासन असतानादेखील नेत्यांमधील भांडणाव्यतिरिक्त काहीही झाले नाही. कॉंग्रेसमधील मुत्तेमवार गट व चतुर्वेदी-राऊत गटाच्या भांडणात नागपूरचे प्रचंड नुकसान झाले. सत्ता नसतानादेखील हे नेते आपापसातीलच भांडणात व्यस्त आहे. लोकांच्या जमिनी हडप करणे हीच कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. मिहान प्रकल्पग्रस्तांना हक्काचे मालकीपट्टे देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नरत आहोत. जमिनीची मोजणी करायची होती. मात्र काही लोकांच्या पोटात दुखते आहे. जनतेसाठी काय काम केले, याचे ५ वर्षे पूर्ण झाल्यावर ‘रिपोर्टकार्ड’च सादर करू, असे ते म्हणाले.जे बोलतो ते करतो, सेनेला चिमटायावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. जगातील श्रीमंत शहरांपैकी मुंबई एक शहर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा आहे. मात्र असे असतानादेखील तेथील १ थेंब सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सगळे सांडपाणी समुद्रात जाते. नागपुरात नेमकी विरुद्ध स्थिती आहे, असे म्हणत त्यांनी ‘बीएमसी’च्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि माझे शब्द ही काळ्या दगडावरील रेघच असते, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले. ..तर चेहरा दाखविणार नाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरचा वेगाने विकास होत आहे. २०१९ पर्यंत नागपूरला देशातील ‘मॉडेल’ शहर बनवायचे आहे. जर असे झाले नाही तर मी चेहरादेखील दाखविणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.