शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

कन्हैयाच्या सभेत गोंधळ

By admin | Updated: April 15, 2016 03:03 IST

कन्हैया कुमारच्या सभेत चप्पल, जोडा भिरकावून, घोषणाबाजी करून काही तरुणांनी गोंधळ घातल्याने सभास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

जमावाकडून गोंधळ घालणाऱ्यांना चोप : जोरदार घोषणाबाजीनागपूर : कन्हैया कुमारच्या सभेत चप्पल, जोडा भिरकावून, घोषणाबाजी करून काही तरुणांनी गोंधळ घातल्याने सभास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना बेदम चोप दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्यांना जमावाच्या तावडीतून सोडवल्याने संभाव्य अनर्थ टळला.धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात बुधवारी आयोजित सभेला कन्हैया कुमार संबोधित करणार असल्याचे कळाल्याने सभागृहाच्या आतबाहेर मोठी गर्दी जमली होती. दुपारी २.१५ वाजता कन्हैया कुमारच्या भाषणाला सुरुवात होताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ सुरू केला. त्यामुळे सभागृहातील उपस्थितांपैकी काही तरुणांनी त्यांना पकडून मारहाण करीतच बाहेर काढले. मोठ्या संख्येत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना गराडा घातला. मात्र, पोलिसांच्या हातून खेचत संतप्त जमावाने त्या तरुणांना सभागृहाबाहेर जोरदार मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून कशीबशी सोडवणूक करून त्यांना आपल्या वाहनात बसवून धंतोली ठाण्यात आणले.पोलिसांच्या वाहनात बसल्यानंतर त्यांनी भारत माता की जय आणि कन्हैया कुमार विरोधी घोषणा दिल्या. प्रत्युतरात पोलिसांच्या वाहनाला गराडा घालून आंबेडकरी अनुयायांनी ‘जय भीम... जय भीम’ची जोरदार घोषणाबाजी केली. ४० मिनिटांच्या कालावधीत जवळपास सारखे असे हे प्रसंग ४ वेळा घडले. दरम्यान, भाषण सुरू असताना कन्हैयाच्या दिशेने चप्पल, बुट फेकणाऱ्यापैकी हरिदास शेंडे यालाही जमावाने बुकलून बाहेर काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सर्वांना पोलीस मुख्यालयात नेले. (प्रतिनिधी)रस्त्यावरही घोषणाबाजी सभागृहाबाहेर अशी घोषणाबाजी आणि तणावाचे वातावरण असताना महाविद्यालयाच्या गेटबाहेरही प्रचंड गर्दी होती. तेथे येऊन काही तरुण घोषणाबाजी करून पळून जात होते. त्यामुळे बाहेरही तणावाचे वातावरण होते. दोन वेळा वाहनातील तरुणांनी भारत माता की जय, अशी घोषणाबाजी केली. तर, काही तरुणांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या गेट समोर भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी बराच वेळपर्यंत घोषणाबाजी केली. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ होणार, अशी भीती वर्तविली जात असल्यामुळे पोलिसांनी धनवटे नॅशनल कॉलेजसमोर प्रचंड बंदोबस्त लावला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री भेट घेतली. त्यांना संभाव्य धोके लक्षात आणून दिल्यानंतर स्टेज तसेच सभागृहात कन्हैयाच्या आजूबाजूला कोण असतील, एकमेकांना कोण कसे ओळखतील, त्याबाबत चर्चा करण्यात आली. निळी आणि लाल रिबीन एकत्र शिवून ती आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांच्या दंडावर बांधण्याचे ठरले. कन्हैयाकुमार येण्याच्या तासाभरापूर्वीच पोलिसांनी डीएनसीचा ताबा घेतला होता. धंतोली तसेच अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत शहर राखीव दल आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या डीएनसीच्या आतबाहेर तैनात करण्यात आल्या होत्या. अजनीचे सहायक आयुक्त राठोड, धंतोलीचे ठाणेदार राजन माने पूर्णवेळ बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. तर, गोंधळ सुरू होताच उपायुक्त ईशू सिंधू, अभिनाश कुमार आणि शैलेश बलकवडे हे सुद्धा डीएनसीत आले. बूट भिरकावणारा तरुण यवतमाळचाकन्हैयाच्या सभेत बूट भिरकावणाऱ्या तरुणाचे नाव हरिदास मारोतराव शेंडे (वय २५) असून, तो यवतमाळचा रहिवासी आहे. तत्पूर्वी विमानतळावर दगडफेक आणि गोंधळ घालणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हितेश ऊर्फ बिट्टू सावडिया (वय २२), शानू ललित सावडिया (वय २२), शुभम राजेश अरखेडे (वय २०) आणि यश राजकुमार शर्मा (वय ३०) यांना सोनेगाव पोलिसांनी अटक केली. तर, डीएनसीत गोंधळ करून चप्पल, जोडा भिरकावल्याच्या आरोपात हरिदास शेंडे याच्यासह २१ जणांना धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी १.३० वाजता कन्हैया काछीपुऱ्यातील एका लॉजमध्ये जेवण घेण्यासाठी गेला होता. तेथे सत्कार करण्याच्या बहाण्याने दाखल झालेल्या काही तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी परशू ठाकूरसह आठ जणांना ताब्यात घेतले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ३३ जणांना दिवसभरात ताब्यात घेतले. त्यातील शेंडे वगळता सर्वांना सोडण्यात आले.