शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

होम क्वारंटाइनवरून नागरिकांचा गोंधळ, प्रशासनाच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:24 IST

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनासमोर रोज नवनव्या अडचणी पुढे येत आहेत. कुठे जनप्रतिनिधींकडून तर कुठे नागरिकांकडून या अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाच्या अनुमतीनंतरही विरोध : लॉकडाऊनमुळे स्वगावी जाण्यास असमर्थता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनासमोर रोज नवनव्या अडचणी पुढे येत आहेत. कुठे जनप्रतिनिधींकडून तर कुठे नागरिकांकडून या अडचणी निर्माण होत आहेत. शुक्रवारी रात्री जाफरनगरातील अनंतनगर परिसरात प्रशासनाच्या अनुमतीने होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांवरून स्थानिक नागरिकांनी असाच गोंधळ घातला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.क्वारंटाइन करण्यात आलेले हे नागरिक नवी दिल्लीशी संबंधित आहेत. त्यांच्या प्रवासाचा मागोवा लक्षात घेता त्यांना १४ दिवसासाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. या काळात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेवरून पुढील १४ दिवसासाठी होम क्वारंटाइन करायचे होते. मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. यामुळे प्रशासनाने ग्रीन पार्कमधीलजाकीर खान यांना त्यांच्या मालकीच्या अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये या नागरिकांच्या निवासाला अनुमती दिली होती.प्रशासनाचीच होती परवानगीजिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी २४ एप्रिलला एक पत्र जारी करू न जाफरनगरातील अनंतनगर परिसरातील ग्रीन पार्क अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर ३०२ आणि ३०३ मध्ये होम क्वारंटाइन म्हणून काही लोकांना ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. ३ मेपर्यंत त्यांना तिथे ठेवता येईल, असेही प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.ही तर मानवता !या प्रकारावर बोलताना जाकीर खान म्हणाले, मानवतेच्या भावनेने प्रशासनाच्या अनुमतीनंतर या नागरिकांना होम क्वारंटाइन म्हणून ठेवण्यासाठी आपण मदतीचा हात पुढे केला. भविष्यात कुणाच्या कुटुंबात अशी स्थिती उद्भवल्यावर होम क्वारंटाइन करायची वेळ आली तर त्यांना दूर लोटणार का? आम्हाला केवळ शारीरिक अंतर राखायचे आहे, सामाजिक नव्हे.यामुळे झाला गोंधळ!कोरोना संक्रमणाचा प्रसार थांबविण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या रोषाचा सामनाही प्रशासनाला करावा लागत आहे. क्वारंटाइनचा काळ पूर्ण केल्यावर ज्यांना होम क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले, ते सर्व जण नागपूरबाहेर राहणारे आहेत. सध्या वाहतूक व जिल्हा सीमा बंद असल्याने प्रशासनाला त्यांच्या निवासाची व्यवस्था नागपुरात करावी लागत आहे. त्यांना निवासी ठेवण्यासाठी या काळातही काही जागरूक नागरिक पुढे येत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांमध्ये यासंदर्भात गैरसमज असल्याने हा विरोध व्यक्त होत आहे. परिणामत: या विषयावर आता प्रशासनाला वेळ खर्ची करावा लागत आहे. असाच विरोध क्वारंटाइन सेंटर उघडण्यालाही आहे. त्यामुळे प्रशासनाला व्यवस्था करताना बराच त्रास होत आहे.

वानाडोंगरी केंद्रातील  त्या १२६ जणांना अखेर हलवले

 वानाडोंगरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या त्या १२६ लोकांना शनिवारी नागपुरात स्थानांतरित करण्यात आले. चार बसेसने या लोकांना नागपुरातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आले.  वानाडोंगरी येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सतरंजीपुरा येथील १२६ जणांना ठेवण्यात आले होते. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी याला प्रचंड विरोध केला. लोकभावनेचा आदर करीत जिल्हा प्रशासनाने शनिवारी या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केले. यानंतर वसतिगृह व परिसरात फवारणीही करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर