शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

होम क्वारंटाइनवरून नागरिकांचा गोंधळ, प्रशासनाच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:24 IST

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनासमोर रोज नवनव्या अडचणी पुढे येत आहेत. कुठे जनप्रतिनिधींकडून तर कुठे नागरिकांकडून या अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाच्या अनुमतीनंतरही विरोध : लॉकडाऊनमुळे स्वगावी जाण्यास असमर्थता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनासमोर रोज नवनव्या अडचणी पुढे येत आहेत. कुठे जनप्रतिनिधींकडून तर कुठे नागरिकांकडून या अडचणी निर्माण होत आहेत. शुक्रवारी रात्री जाफरनगरातील अनंतनगर परिसरात प्रशासनाच्या अनुमतीने होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांवरून स्थानिक नागरिकांनी असाच गोंधळ घातला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.क्वारंटाइन करण्यात आलेले हे नागरिक नवी दिल्लीशी संबंधित आहेत. त्यांच्या प्रवासाचा मागोवा लक्षात घेता त्यांना १४ दिवसासाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. या काळात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेवरून पुढील १४ दिवसासाठी होम क्वारंटाइन करायचे होते. मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. यामुळे प्रशासनाने ग्रीन पार्कमधीलजाकीर खान यांना त्यांच्या मालकीच्या अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये या नागरिकांच्या निवासाला अनुमती दिली होती.प्रशासनाचीच होती परवानगीजिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी २४ एप्रिलला एक पत्र जारी करू न जाफरनगरातील अनंतनगर परिसरातील ग्रीन पार्क अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर ३०२ आणि ३०३ मध्ये होम क्वारंटाइन म्हणून काही लोकांना ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. ३ मेपर्यंत त्यांना तिथे ठेवता येईल, असेही प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.ही तर मानवता !या प्रकारावर बोलताना जाकीर खान म्हणाले, मानवतेच्या भावनेने प्रशासनाच्या अनुमतीनंतर या नागरिकांना होम क्वारंटाइन म्हणून ठेवण्यासाठी आपण मदतीचा हात पुढे केला. भविष्यात कुणाच्या कुटुंबात अशी स्थिती उद्भवल्यावर होम क्वारंटाइन करायची वेळ आली तर त्यांना दूर लोटणार का? आम्हाला केवळ शारीरिक अंतर राखायचे आहे, सामाजिक नव्हे.यामुळे झाला गोंधळ!कोरोना संक्रमणाचा प्रसार थांबविण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या रोषाचा सामनाही प्रशासनाला करावा लागत आहे. क्वारंटाइनचा काळ पूर्ण केल्यावर ज्यांना होम क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले, ते सर्व जण नागपूरबाहेर राहणारे आहेत. सध्या वाहतूक व जिल्हा सीमा बंद असल्याने प्रशासनाला त्यांच्या निवासाची व्यवस्था नागपुरात करावी लागत आहे. त्यांना निवासी ठेवण्यासाठी या काळातही काही जागरूक नागरिक पुढे येत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांमध्ये यासंदर्भात गैरसमज असल्याने हा विरोध व्यक्त होत आहे. परिणामत: या विषयावर आता प्रशासनाला वेळ खर्ची करावा लागत आहे. असाच विरोध क्वारंटाइन सेंटर उघडण्यालाही आहे. त्यामुळे प्रशासनाला व्यवस्था करताना बराच त्रास होत आहे.

वानाडोंगरी केंद्रातील  त्या १२६ जणांना अखेर हलवले

 वानाडोंगरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या त्या १२६ लोकांना शनिवारी नागपुरात स्थानांतरित करण्यात आले. चार बसेसने या लोकांना नागपुरातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आले.  वानाडोंगरी येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सतरंजीपुरा येथील १२६ जणांना ठेवण्यात आले होते. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी याला प्रचंड विरोध केला. लोकभावनेचा आदर करीत जिल्हा प्रशासनाने शनिवारी या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केले. यानंतर वसतिगृह व परिसरात फवारणीही करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर