शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

दुर्गादेवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:16 IST

नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षाआर्थिक नुकसान सोसावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही दुर्गादेवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचे आदेश अजूनही न आल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहेत. अश्विन नवरात्रोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आता केवळ एक महिना उरला असून मूूर्तीच्या उंचीबाबत आदेश आल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही, असे मूर्तिकारांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. याशिवाय गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात सर्वांना प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मूर्तिकार म्हणाले, यावर्षी अधिक महिना असल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा येत आहेत. त्यानंतरही मनपा आयुक्तांनी मूर्तिकारांची बैठक वा स्वत:हून आदेश दिलेला नाही. मूर्तीची उंची पाहून बेस तयार करावा लागतो. त्यानुसार मूर्ती तयार होते. दरवर्षी ६ किंवा ८ फूट उंच मूर्ती तयार होतात. यावर्षी गणेश मूर्तीची उंची ४ फूटापेक्षा जास्त नसावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार काही मूर्तिकारांनी जास्त उंचीच्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्या मूर्तीची स्थापना करण्यावर निर्बंध आले होते. हीच स्थिती दुर्गादेवीच्या मूर्तीसंदर्भात होऊ नये, असे मत चितार ओळ येथील सूर्यवंशी पेंटरचे संचालक विनोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.अजूनही ऑर्डर नाहीतमनपा आयुक्तांनी नवरात्रोत्सव मंडळाची बैठक न घेतल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही ऑर्डर दिलेली नाही. पण मंडळाची ८ फूट उंच मूर्तीला परवानगी देण्याची मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास ८ फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि उत्सवाला तेवढेच दिवस राहिले आहेत. काही मूर्तिकारांनी गणेशोत्सवाप्रमाणेच ४ फूट उंच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक मंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अजूनही अनिश्चितता आहे.आर्थिक नुकसान सोसावे लागणारकोरोना महामारीमुळे मूर्तिकार आणि मंडळाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन यंदा होणार नसल्याने अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. २० मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिरवणुका वा कोणतेही धार्मिक उत्सवाचे आयोजन झालेले नाही. चार वा सहा महिन्याच्या काळात कमाई करून वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्यांना यंदा उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ब्रॅण्ड, सजावट, मिरवणूक, ढोलताशे, मंडप डेकोरेशन आणि नवरात्रोत्सवाशी संबंधित सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. या सर्वांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी अनेकांनी राज्य शासनाकडे केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक