शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गादेवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:16 IST

नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षाआर्थिक नुकसान सोसावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही दुर्गादेवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचे आदेश अजूनही न आल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रम आहेत. अश्विन नवरात्रोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आता केवळ एक महिना उरला असून मूूर्तीच्या उंचीबाबत आदेश आल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही, असे मूर्तिकारांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. याशिवाय गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात सर्वांना प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मूर्तिकार म्हणाले, यावर्षी अधिक महिना असल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा येत आहेत. त्यानंतरही मनपा आयुक्तांनी मूर्तिकारांची बैठक वा स्वत:हून आदेश दिलेला नाही. मूर्तीची उंची पाहून बेस तयार करावा लागतो. त्यानुसार मूर्ती तयार होते. दरवर्षी ६ किंवा ८ फूट उंच मूर्ती तयार होतात. यावर्षी गणेश मूर्तीची उंची ४ फूटापेक्षा जास्त नसावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार काही मूर्तिकारांनी जास्त उंचीच्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्या मूर्तीची स्थापना करण्यावर निर्बंध आले होते. हीच स्थिती दुर्गादेवीच्या मूर्तीसंदर्भात होऊ नये, असे मत चितार ओळ येथील सूर्यवंशी पेंटरचे संचालक विनोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.अजूनही ऑर्डर नाहीतमनपा आयुक्तांनी नवरात्रोत्सव मंडळाची बैठक न घेतल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही ऑर्डर दिलेली नाही. पण मंडळाची ८ फूट उंच मूर्तीला परवानगी देण्याची मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास ८ फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि उत्सवाला तेवढेच दिवस राहिले आहेत. काही मूर्तिकारांनी गणेशोत्सवाप्रमाणेच ४ फूट उंच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक मंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अजूनही अनिश्चितता आहे.आर्थिक नुकसान सोसावे लागणारकोरोना महामारीमुळे मूर्तिकार आणि मंडळाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन यंदा होणार नसल्याने अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. २० मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिरवणुका वा कोणतेही धार्मिक उत्सवाचे आयोजन झालेले नाही. चार वा सहा महिन्याच्या काळात कमाई करून वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्यांना यंदा उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ब्रॅण्ड, सजावट, मिरवणूक, ढोलताशे, मंडप डेकोरेशन आणि नवरात्रोत्सवाशी संबंधित सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. या सर्वांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी अनेकांनी राज्य शासनाकडे केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक