शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचीदेखील कबुली...नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब

By योगेश पांडे | Updated: December 19, 2023 19:44 IST

प्रेमप्रकरणातून सर्वाधिक मुलींना पळवले

नागपूर: नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला-मुली बेपत्ता होत असल्याची ओरड होत असताना पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे देण्यात येत होती. मात्र आता राज्य शासनानेच नागपूर जिल्ह्यातून केवळ ८ महिन्यांतच सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब झाल्याची बाब कबुल केली आहे. विधानपरिषेदत प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. त्याच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

नागपूर जिल्ह्यात मार्च २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नागपूर जिल्ह्यातून ३ हजार ८३८ व्यक्ती बेपत्ता झाले. त्यातील २ हजार ११ महिला व २२५ मुले-मुलींचा समावेश होता. अनेक अल्पवयीन मुली पालक रागविल्याने, अभ्यासाच्या कारणावरून मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी तसेच कौटुंबिक कारणामुळे निघून जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुलींना विविध आमिषे दाखवून मुलींना पळवून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यातील जास्तीत जास्त प्रकरणे प्रेम संबंधांचे आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्यांपैकी ३ हजार २३९ व्यक्ती आढळले.

तर उर्वरित जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपूर पोलिसांनी पोलीस ठाणे स्तरावर भरोसा सेल व पोलीस दीदी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, झोपडपट्टी, महिला वसतीगृह अशा ठिकाणी पोलीस दिदींचे पथक भेट देऊन किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन करतात. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हरविलेल्या व्यक्तींच्या सापडण्याचे प्रमाण ८८ टक्के तर पळवून नेलेल्या व्यक्तींच्या सापडण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याचेदेखील उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन