शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 10:41 IST

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य क्षेत्रातून स्थानांतरित करण्यात आलेल्या ३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि अभयारण्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना रद्द करण्यात यावी, अशा मागण्यांसह भारत मुक्ती मोर्चा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठाने बुधवारी या मागण्यांची वैधता तपासण्यासाठी याचिकेवर येत्या ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

मेळघाट व्याघ्र अभयारण्य प्रकल्पाकरिता नगरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाना (बु.), केळापाणी व सोमठाना (खुर्द) या आठ गावांतील आदिवासी नागरिकांची शेतजमीन व रहिवासी जमीन संपादित करण्यात आली आहे, तसेच त्यांचे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कार्यवाहीपूर्वी आदिवासी नागरिकांना पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतजमीन देऊ, रोजगार देऊ, पायाभूत सुविधा विकसित करून देऊ इत्यादी आश्वासने देण्यात आली होती. परंतु, पुनर्वसनानंतर एकही आश्वासन पाळण्यात आले नाही. दरम्यान, उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे येथील सुमारे ३०० नागरिकांचा भूकेने मृत्यू झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एस. डी. डोंगरदिवे यांनी बाजू मांडली.

पुनर्वसन योजनेची बेकायदेशीर अंमलबजावणी

सरकारने पुनर्वसन योजनेची कायदेशीर पद्धतीने अंमलबजावणी केली नाही. पुनर्वसनासंदर्भात ग्रामसभेत ठराव पारीत करण्यात आले नाहीत. नागरिकांना नोटीस बजावून सुनावणीची संधी देण्यात आली नाही. या गावांची आदिवासी क्षेत्रातच पुनर्वसन करणे आवश्यक होते. परंतु, त्यांना आदिवासी संस्कृतीशी काहीच संबंध नसलेल्या आकोट येथे स्थानांतरित करण्यात आले, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMelghatमेळघाट