शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 10:41 IST

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य क्षेत्रातून स्थानांतरित करण्यात आलेल्या ३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि अभयारण्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना रद्द करण्यात यावी, अशा मागण्यांसह भारत मुक्ती मोर्चा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठाने बुधवारी या मागण्यांची वैधता तपासण्यासाठी याचिकेवर येत्या ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

मेळघाट व्याघ्र अभयारण्य प्रकल्पाकरिता नगरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाना (बु.), केळापाणी व सोमठाना (खुर्द) या आठ गावांतील आदिवासी नागरिकांची शेतजमीन व रहिवासी जमीन संपादित करण्यात आली आहे, तसेच त्यांचे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कार्यवाहीपूर्वी आदिवासी नागरिकांना पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतजमीन देऊ, रोजगार देऊ, पायाभूत सुविधा विकसित करून देऊ इत्यादी आश्वासने देण्यात आली होती. परंतु, पुनर्वसनानंतर एकही आश्वासन पाळण्यात आले नाही. दरम्यान, उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे येथील सुमारे ३०० नागरिकांचा भूकेने मृत्यू झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एस. डी. डोंगरदिवे यांनी बाजू मांडली.

पुनर्वसन योजनेची बेकायदेशीर अंमलबजावणी

सरकारने पुनर्वसन योजनेची कायदेशीर पद्धतीने अंमलबजावणी केली नाही. पुनर्वसनासंदर्भात ग्रामसभेत ठराव पारीत करण्यात आले नाहीत. नागरिकांना नोटीस बजावून सुनावणीची संधी देण्यात आली नाही. या गावांची आदिवासी क्षेत्रातच पुनर्वसन करणे आवश्यक होते. परंतु, त्यांना आदिवासी संस्कृतीशी काहीच संबंध नसलेल्या आकोट येथे स्थानांतरित करण्यात आले, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMelghatमेळघाट