शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 10:41 IST

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य क्षेत्रातून स्थानांतरित करण्यात आलेल्या ३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि अभयारण्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना रद्द करण्यात यावी, अशा मागण्यांसह भारत मुक्ती मोर्चा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठाने बुधवारी या मागण्यांची वैधता तपासण्यासाठी याचिकेवर येत्या ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

मेळघाट व्याघ्र अभयारण्य प्रकल्पाकरिता नगरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाना (बु.), केळापाणी व सोमठाना (खुर्द) या आठ गावांतील आदिवासी नागरिकांची शेतजमीन व रहिवासी जमीन संपादित करण्यात आली आहे, तसेच त्यांचे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कार्यवाहीपूर्वी आदिवासी नागरिकांना पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतजमीन देऊ, रोजगार देऊ, पायाभूत सुविधा विकसित करून देऊ इत्यादी आश्वासने देण्यात आली होती. परंतु, पुनर्वसनानंतर एकही आश्वासन पाळण्यात आले नाही. दरम्यान, उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे येथील सुमारे ३०० नागरिकांचा भूकेने मृत्यू झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एस. डी. डोंगरदिवे यांनी बाजू मांडली.

पुनर्वसन योजनेची बेकायदेशीर अंमलबजावणी

सरकारने पुनर्वसन योजनेची कायदेशीर पद्धतीने अंमलबजावणी केली नाही. पुनर्वसनासंदर्भात ग्रामसभेत ठराव पारीत करण्यात आले नाहीत. नागरिकांना नोटीस बजावून सुनावणीची संधी देण्यात आली नाही. या गावांची आदिवासी क्षेत्रातच पुनर्वसन करणे आवश्यक होते. परंतु, त्यांना आदिवासी संस्कृतीशी काहीच संबंध नसलेल्या आकोट येथे स्थानांतरित करण्यात आले, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMelghatमेळघाट