शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नागपूर शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:02 IST

Condition of five major lakes in Nagpur city is very bad नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

ठळक मुद्देनीरीचा अहवाल : सक्करदरा, नाईक तलाव धोक्यात, अंबाझरी ठिकठाक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आपण विचार करीत नसलो तरी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या एक एक गोष्टी गमावत चाललो आहे, हे मानावे लागेल. तलावांच्या बाबतीत हेच होत आहे. कुठल्याही शहराला असे वैभव मिळाले नाही पण संवर्धनासाठी गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. तलावांच्या बाबतीत अशीच अवस्था आहे. नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिवेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- नीरीच्या टीमने प्रत्येक तलावातून वरच्या स्तराची व खोलातील नमुन्यांची सखोल तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे.

अभ्यासातील महत्त्वपूर्ण बाबी

- सर्व तलावांचे पीएच लेव्हल ६.९ ते ८.५ च्या दरम्यान आहे.

- गढूळपणा ५ ते १०० एनटीयूपर्यंत म्हणजे सामान्यपेक्षा कितीतरी अधिक.

- सल्फेट/नायट्रेट ३६ ते १८६ व ३ ते ४० मिग्रॅ/लिटरच्या रेंजमध्ये.

- सीओडी २५ ते १४० मिग्रॅ/लिटर तर बीओडी ४.६ ते ८० मिग्रॅ/लिटर.

- फुटाळ्यात सीओडी १६ ते ४० मिग्रॅ/लि. व बीओडी ६-२० मिग्रॅ/लि.

- फुटाळ्याचा आम्लपणा २२० ते ३४८ मिग्रॅ/लिटर, गढूळपणा १० एनटीयू. सल्फेट/नायट्रेट ६५ ते ८८ मिग्रॅ/लिटर.

तलावांनुसार स्थिती

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- नाईक तलावात विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण २००० मिग्रॅ/ली.च्यावर

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून त्याच्या असण्याने सिवेज वाहत असल्याचे लक्षात येते.

- नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/लि. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, क्लोराईड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावांमध्ये मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.

टॅग्स :Sakkardara Lakeसक्करदरा तलावnagpurनागपूर