शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:02 IST

Condition of five major lakes in Nagpur city is very bad नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

ठळक मुद्देनीरीचा अहवाल : सक्करदरा, नाईक तलाव धोक्यात, अंबाझरी ठिकठाक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आपण विचार करीत नसलो तरी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या एक एक गोष्टी गमावत चाललो आहे, हे मानावे लागेल. तलावांच्या बाबतीत हेच होत आहे. कुठल्याही शहराला असे वैभव मिळाले नाही पण संवर्धनासाठी गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. तलावांच्या बाबतीत अशीच अवस्था आहे. नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिवेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- नीरीच्या टीमने प्रत्येक तलावातून वरच्या स्तराची व खोलातील नमुन्यांची सखोल तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे.

अभ्यासातील महत्त्वपूर्ण बाबी

- सर्व तलावांचे पीएच लेव्हल ६.९ ते ८.५ च्या दरम्यान आहे.

- गढूळपणा ५ ते १०० एनटीयूपर्यंत म्हणजे सामान्यपेक्षा कितीतरी अधिक.

- सल्फेट/नायट्रेट ३६ ते १८६ व ३ ते ४० मिग्रॅ/लिटरच्या रेंजमध्ये.

- सीओडी २५ ते १४० मिग्रॅ/लिटर तर बीओडी ४.६ ते ८० मिग्रॅ/लिटर.

- फुटाळ्यात सीओडी १६ ते ४० मिग्रॅ/लि. व बीओडी ६-२० मिग्रॅ/लि.

- फुटाळ्याचा आम्लपणा २२० ते ३४८ मिग्रॅ/लिटर, गढूळपणा १० एनटीयू. सल्फेट/नायट्रेट ६५ ते ८८ मिग्रॅ/लिटर.

तलावांनुसार स्थिती

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- नाईक तलावात विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण २००० मिग्रॅ/ली.च्यावर

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून त्याच्या असण्याने सिवेज वाहत असल्याचे लक्षात येते.

- नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/लि. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, क्लोराईड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावांमध्ये मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.

टॅग्स :Sakkardara Lakeसक्करदरा तलावnagpurनागपूर