शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पोषण आहाराला बायोमेट्रिकची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:37 IST

पूरक पोषण आहार बायोमेट्रिक हजेरीपटावर विद्यार्थ्यांची हजेरी घेऊनच वितरण करायचे आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीनच नसल्याने विद्यार्थी पूरक पोषण आहारापासून वंचित राहत आहे.

ठळक मुद्देअनेक शाळांत मशीनच नाहीदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी राहणार वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाबरोबर पूरक पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत. पण हा पूरक पोषण आहार बायोमेट्रिक हजेरीपटावर विद्यार्थ्यांची हजेरी घेऊनच वितरण करायचे आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीनच नसल्याने विद्यार्थी पूरक पोषण आहारापासून वंचित राहत आहे.राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस पूरक पोषण आहार देण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील तीन दुष्काळी तालुक्यातील व आठ दुष्काळग्रस्त मंडळातील ५१ हजार १५५ विद्यार्थ्यांना हा पूरक पोषण आहार द्यायचा आहे. शाळा व्यवस्थापन समितीला बायोमेट्रिक हजेरीपटाद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्यांना आहाराचे वितरण करायचे आहे. यासाठी शाळांना प्रती विद्यार्थी प्रती दिन ५ रुपयाप्रमाणे निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यात दुष्काळ घोषित केलेले तालुके व मंडळांतील सरकारी व अनुदानित शाळांसाठी ही योजना आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर पुढील दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश भागाची यादी घोषित होईपर्यंत लागू राहील, असे शासन परिपत्रात नमूद आहे.नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर व नरखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे तर गोधनी, आडेगाव, टाकळघाट, देवलापार, मकरधोकडा, हेवती, पाचगाव व मांढळ या आठ मंडळांमध्येही दुष्काळ घोषित केला आहे.यातील सरकारी व अनुदानित शाळांतील तब्बल ५१ हजार १५५ विद्यार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस मध्यान्ह भोजनात दूध, अंडी, फळे किंवा स्थानिक गरजेनुसार पूरक आहार देण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही ही योजना सुरू राहील. शाळांना या योजनेच्या लाभ देण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्यांना हा आहार पुरवायचा आहे. त्या हजेरीनुसारच शाळांना प्रती दिवस प्रती विद्यार्थी पूरक आहारासाठी पाच रुपयाचे अनुदान शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

अट ठरतेय जाचकराज्यात दुष्काळ घोषित होऊन तीन महिने लोटले आहे. मात्र, अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही. शासनाने बायोमॅट्रिक हजेरी पट आवश्यक असल्याची अट घातली आहे. ही बायोमेट्रिक मशिन जि.प. किंवा लोक सहभागातून घ्यायची आहे. मात्र, आज ७-८ हजाराच्या घरात ही मशीन येते. याला संगणक, इंटरनेट कनेक्शन व वीज पुरवठा आदी गोष्टीची गरज असते. या सर्व बाबींमुळे शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लागल्या नाही व योजनेची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Schoolशाळा