शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

नऊ ठरावांसह नागपुरातील अक्षर साहित्य संमेलनाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:42 IST

साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्यांच्या सृजनाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या नवसृजनाच्या मूल्यमापनासाठी साहित्य संमेलन आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसाहित्याचे मूल्यमापन, चिकित्सा करण्यासाठी संमेलन : प्रज्ञा आपटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्यांच्या सृजनाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या नवसृजनाच्या मूल्यमापनासाठी साहित्य संमेलन आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले.साहित्य विहार संस्थेच्यावतीने आयोजित अक्षर साहित्य संमेलनाच्या सांगता प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका आशा बगे, संस्थेच्या अध्यक्षा आशा पांडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. आपटे यांनी संमेलनाच्या फलश्रुतीवर आपले विचार मांडले. साहित्यिक एकांतात लिहीत असले तरी ते लोकांतात पोहचावे, त्याला दाद मिळावी, ही त्यांची अपेक्षा असते. या सृजनशीलतेची गजबज संमेलनातून होते. अनेक नवोदित कवी, कथाकार, लेखक आहेत, ज्यांना मोठ्या संमेलनात संधी मिळत नाही. अशा नवोदितांना रसिकांची साद घालता यावी, यासाठी असे लहानमोठी संमेलने आवश्यक आहेत. मोठमोठ्या साहित्य संमेलनात महिलांना फार स्थान मिळाले नाही. अशा संमेलनातून ते मिळावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तज्ज्ञ साहित्यिकांचे मार्गदर्शन नवोदितांना मिळावे, कथेमागची कथा शिकण्याचे तंत्र शिकता यावे, ब्लॉग तसेच नवनवीन माध्यमांवर लेखनाचे तंत्र समजावे, अशा सर्व गोष्टींचा उहापोह संमेलनातून होणे गरजेचे आहे. रचनाकार आणि वाचकही विकृत, खलनायकी साहित्याकडे वळू नये आणि आनंद देणारे साहित्य समाजाच्या हिताचेही असावे, यासाठी सृजनशील साहित्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी संमेलनाची भूमिका महत्त्वाची आहे. एकूणच संमेलन म्हणजे सुसंस्कृतपणाकडे नेणाऱ्या वाङ्मयीन संस्कृतीच्या बीजारोपणाची प्रक्रिया होय, असे मनोगत डॉ. आपटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शालिनी कुकडे यांनी केले.हे ठराव झाले पारितमराठीच्या अभ्यासाच्या सुविधेसाठी मराठी अभ्यास केंद्राची निर्मिती करावी, मराठी शाळांनी या भाषेची आवड निर्माण करण्यासाठी बाल साहित्य संमेलनासारखे उपक्रम व विविध स्पर्धा घ्याव्या, घराघरात मराठीची सुभाषिते व विचार संग्रह वितरित व्हावे, ग्रामीण मराठीचे प्रमाण भाषेत अनुवाद करून जोडणी करावी जेणेकरून समता व समरसता साधेल, लेखन, वाचन संस्कृतीच्या विकासासाठी नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना शासकीय मदत मिळावी, सर्व प्राथमिक शाळांत मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य व्हावे, शासकीय संस्थांप्रमाणे खासगी संस्था व बँकांच्या व्यवहारात मराठी भाषा अनिवार्य करावी, मराठी भाषेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना अनुदान व अशा संस्था स्थापण्याच्या अटी शिथिल कराव्यात, खासगी संस्थांकडून मदतीसाठी प्रयत्न व्हावे, असे ठराव या संमेलनात पारित करण्यात आले. हे ठराव लवकरच राज्य शासन तसेच साहित्य व संस्कृती मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. विनोद अलोणी यांनी यावेळी सांगितले.यांचा झाला सत्कारसंमेलनादरम्यान लेखक शामाकांत कुळकर्णी, अरुणा सबाने, कुसुमताई कमलाकर, विजय फणशीकर, लक्ष्मण लोखंडे, डॉ. संजय वाघ, अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी, चंद्रकांत चन्ने, बाबा देशपांडे, विष्णू मनोहर, शिशिर पारखी, वंदना मुजुमदार, डॉ. मनीषा यमसनवार, सुजाता लोखंडे, वृंदा काठे, अंश रंदे, आशा बगे, वि.स. जोग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मराठीही अर्थव्यवस्थेशी जोडली जावीसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘मराठी शाळांची रोडावणारी पटसंख्या’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून प्रा. मदन ढोले, नीता वर्णेकर, मृणालिनी वाघमारे यांनी मराठीकडे दुर्लक्ष होण्याची विविध कारणे विशद केली. अध्यक्षस्थानी असलेले डॉ. कुमार शास्त्री यांनी रोजगारासाठी, अर्थव्यवस्थेसाठी इंग्रजीचा वापर होत असल्याने मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे अर्थव्यवस्थेशी मराठी जोडली जाण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या दुसºया सत्रात ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला.

 

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य