शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२७ चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट : राज्यात शासकीय रुग्णालयात मेयो आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:31 IST

जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे.

ठळक मुद्देमूकबधिरता होत आहे दूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येत ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करून मूकबधिरता दूर करणारे राज्यातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे.ज्या चिमुकल्यांना जन्मापासून ऐकू येत नव्हते. श्रवणदोष असल्याने त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. पैसे नसल्याने महागडे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ खरेदी करणेही शक्य नव्हते. अशांसाठी मेयोचे ‘ईएनटी’ विभागातील ‘कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र’ आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या पुढाकारामुळे कॉक्लीअर इम्प्लांट केंद्राला २०१७ मध्ये सुरुवात झाली. विदर्भातील एकमेव शासकीय रुग्णालयात सुरू झालेल्या या केंद्राचा फायदा गरजूंना होऊ लागला आहे. सुरुवातीला चार रुग्णांवर यशस्वी ‘इम्प्लांट’ केल्यानंतर पुढे हा आकडा वाढतच गेला. शनिवार १ जून रोजी पुन्हा चार बालकांवर हे ‘इम्प्लांट’ करण्यात आल्याने हा आकडा २१ वर पोहचला आहे. पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना ‘स्पीच थेरपी’ देऊन त्यांना बोलतेही केले जात आहे.श्रवण चाचणीची पहिली ओपीडीमेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. वेदी यांनी पहिली श्रवण चाचणी ओपीडी सुरू केली आहे. यामुळे मेयो रुग्णालयात जन्म घेतलेल्या बालकांची श्रवण चाचणी करून दोष आढळल्यास त्याला उपचाराखाली आणले जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्येही हा पहिलाच उपक्रम आहे. डॉ. वेदी यांच्यानुसार, जन्मजात बहिरेपणाचे निदान होऊन ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया झाल्यास श्रवणदोष दूर करण्याचा यशाचा टक्का वाढतो. यामुळे ही ओपीडी श्रवणदोष दूर करणारे एक माध्यम ठरत आहे.१५ बालकांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षाडॉ. वेदी म्हणाले, श्रवणदोष दूर करणारे हे केंद्र कमी वेळात प्रसिद्धीस आले आहे. यामुळे दिवसेंदिवस श्रवणदोषाच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हे महागडे यंत्र आहे. यामुळे गरजू रुग्णांना निवडून त्यावर ही शस्त्रक्रिया केली जात आहे. सध्याच्या स्थितीत १५ बालके या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)