शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

खासगी बँकांची सक्तीची वसुली सुरुच : रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:19 IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २८ मार्चला मोरॅटोरियमची (मुदतवाढ) घोषणा करताना तीन महिन्याचे हप्ते पुढे ढकलण्याचे आदेश राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना दिले होते. त्यानंतरही ग्राहकांना सूचना न देताना राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची सक्तीची वसुली सुरूच असून त्यामुळे कर्जदाराला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआयडीएफसी फर्स्ट बँकेचे कर्जदार त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २८ मार्चला मोरॅटोरियमची (मुदतवाढ) घोषणा करताना तीन महिन्याचे हप्ते पुढे ढकलण्याचे आदेश राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना दिले होते. त्यानंतरही ग्राहकांना सूचना न देताना राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची सक्तीची वसुली सुरूच असून त्यामुळे कर्जदाराला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.एक प्रकरण फोटो स्टुडिओचे संचालक श्रीकांत देऊळकर यांच्या कर्जाचे आहे. श्रीकांत म्हणाले, आयडीएफसी फर्स्ट बँकेतून १ लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज जानेवारी २०२० मध्ये घेतले आणि २ फेब्रुवारीपासून मासिक हप्ते सुरू झाले. हे हप्ते २ जानेवारी २०२३ पर्यंत मासिक ४१७५ रुपयांप्रमाणे भरायचे होते. दोन महिने हप्ते भरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. त्यापूर्वी महाराष्ट्रात १८ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासूनच फोटो स्टुडिओ बंद असून उत्पादनाचे साधन नाहीच. रिझर्व्ह बँक गव्हर्नरच्या मोरॅटोरियमच्या घोषणेनुसार वाढविलेल्या तीन महिन्याच्या हप्त्याचे व्याज मात्र कर्जदाराला भरायचे आहे. तसे पाहिल्यास एक लाखाच्या कर्जावर व्याजासह १ लाख ४१ हजार ९३८ रुपये तीन वर्षांत भरण्याचे नियोजित होते. बँकेने फोन करून हप्ते न भरलेल्या तीन महिन्याचे व्याज ८,८५३ रुपये भरण्यास सांगितले. यानुसार बँक आता वाढीव हप्त्यासह ३९ महिन्यात १ लाख ५० हजार ७९२ रुपये वसूल करणार आहे.श्रीकांत म्हणाले, मुदतवाढ मिळालेल्या तीन मासिक हप्त्यावर आकडेमोड केल्यास तीन महिन्याचे व्याज ८,८५३ रुपये होत नाही. बँकेने तीन महिन्यांऐवजी पुन्हा तीन वर्ष अतिरिक्त व्याजाची आकारणी केली का, यावर स्पष्टता नाही. या संदर्भात बँकेला ई-मेल पाठवून विचारणा केली असता अधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार व्याजाची आकारणी करण्यात येत असल्याचे बँकेने सांगितले आहे. हीच बाब अन्य ग्राहकांच्या बाबतीतही घडत आहे. फोटो स्टुडिओ बंद असल्याने उत्पन्नाचे साधनही नाही. आर्थिक मिळकत नसताना बँकेच्या अनावश्यक भुर्दंडामुळे मानसिक त्रास होत आहे. अनावश्यक वसुली बंद करावी, अशी मागणी बँकेकडे केल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.