शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांच्या सवलीतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST

कळमेश्वर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे ...

कळमेश्वर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे कारभारात पारदर्शकता येणार असली तरी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल आणि ई-सेवा केंद्रापासून दूर असलेला सामान्य शेतकरी या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

वर्षाला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. खरीप-रब्बी हंगामासाठी सवलतीच्या दरात बियाणे, खते, औषधे दिले जातात. शिवाय शेतीविषयक साहित्याची खरेदी आणि फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

या अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यातून सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. खरीप-रब्बी हंगामासाठी वर्षाला ठरावीक गावांची निवड करून त्या गावातील गरजू शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे देण्यात येत होते. मात्र या वर्षीपासून हे बियाणे मिळविण्यासाठीही आता महाडीबीटी या पोर्टलवर कागदपत्रांसह अर्ज करावे लागले. अर्जातून सोडत काढून ठरावीक शेतकऱ्यांना या बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. मात्र बहुसंख्य शेतकऱ्यापर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहोचतच नाही. पोहोचल्या तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेलच याची खात्री नाही नसते. त्यामुळे सामान्य शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयाची पायरीच चढत नाही. आता तर सर्व योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनांपासून वंचितच राहणार आहेत. कारण शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात जावे लागणार आहे. ग्रामीण भागात सर्व्हर डाऊनचाही प्रश्न आहे.

काही ठरावीक गटांनाच अनुदान

शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सवलती मिळत आहेत. त्याच पद्धतीने कुषी सहायता गटासाठी २०० हून अधिक योजना कार्यरत आहेत. गटामार्फत एखादा लघुउद्योग सुरू केला तर ५० ते ७५ टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते. तालुक्यात अनेक कृषी गट कार्यरत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या गटाच्या माध्यमातूनही काही ठरावीक लोकच शासनाच्या योजनांचा लाभ घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाने या योजना गरजू शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.