शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

कृषी योजनांच्या सवलीतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST

कळमेश्वर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे ...

कळमेश्वर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे कारभारात पारदर्शकता येणार असली तरी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल आणि ई-सेवा केंद्रापासून दूर असलेला सामान्य शेतकरी या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

वर्षाला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. खरीप-रब्बी हंगामासाठी सवलतीच्या दरात बियाणे, खते, औषधे दिले जातात. शिवाय शेतीविषयक साहित्याची खरेदी आणि फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

या अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यातून सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. खरीप-रब्बी हंगामासाठी वर्षाला ठरावीक गावांची निवड करून त्या गावातील गरजू शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे देण्यात येत होते. मात्र या वर्षीपासून हे बियाणे मिळविण्यासाठीही आता महाडीबीटी या पोर्टलवर कागदपत्रांसह अर्ज करावे लागले. अर्जातून सोडत काढून ठरावीक शेतकऱ्यांना या बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. मात्र बहुसंख्य शेतकऱ्यापर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहोचतच नाही. पोहोचल्या तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेलच याची खात्री नाही नसते. त्यामुळे सामान्य शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयाची पायरीच चढत नाही. आता तर सर्व योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनांपासून वंचितच राहणार आहेत. कारण शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात जावे लागणार आहे. ग्रामीण भागात सर्व्हर डाऊनचाही प्रश्न आहे.

काही ठरावीक गटांनाच अनुदान

शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सवलती मिळत आहेत. त्याच पद्धतीने कुषी सहायता गटासाठी २०० हून अधिक योजना कार्यरत आहेत. गटामार्फत एखादा लघुउद्योग सुरू केला तर ५० ते ७५ टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते. तालुक्यात अनेक कृषी गट कार्यरत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या गटाच्या माध्यमातूनही काही ठरावीक लोकच शासनाच्या योजनांचा लाभ घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाने या योजना गरजू शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.