शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:31 IST

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभगवद्गीतेत मांडली आहे मनाची ‘पॅथालॉजी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीत मनासंबंधी सखोल विचार झाला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या संशोधनाबाबत चर्चा होताना दिसते. मात्र आपल्या देशातील मानसशास्त्रात वेगळी दृष्टी होती. आपल्या परंपरेत मनाचा विचार वैज्ञानिक पद्धतीने झाला आहे. त्यामुळे भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड लिखित ‘मन आणि आपण’ या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्याच्या बऱ्याच कृतींचा थेट मनाशी संबंध असतो. प्रत्येकाची वेगवेगळी वृत्ती असते व उपजत स्वभाव असतो. आपल्यासोबतचे चांगले मित्र नेहमी आरसा दाखवितात. मात्र मनात अहंकार असला की व्यक्ती मित्रांचेही ऐकत नाही. यातून ‘मी’पणा वाढतो व तो घातक ठरू शकतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.आयुष्यात वावरत असताना नमते नेमके कुणी घ्यावे, या मुद्यावरून अनेकदा वाद होतात. मीच का नमते घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो आणि यातूनच ‘ब्रेकअप’ होताना दिसतात. अगोदर एकत्र कुटुंबपद्धती होती व त्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लहानपणापासूनच होती.मात्र आताच्या व्यवस्थेत अहंकार योग्य वेळी आवरता कसा घ्यावा, याची सवयच राहिलेली नाही. यापासून सुटका हवी असेल तर आत्मियतेचा परीघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशाचा ‘हॅपीनेस इन्डेक्स’ सातत्याने घसरतो आहे. आपण वेगळ्याच तणावाखाली वावरतो आहे.दुसरीकडे पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा विसर पडतो आहे. अशास्थितीत मानसोपचार तज्ज्ञांनी समाजप्रबोधन करावे, असे डॉ. शेंबेकर यांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांनीदेखील मनोगत मांडले. शिल्पा नंदनपवार यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत