शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:31 IST

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभगवद्गीतेत मांडली आहे मनाची ‘पॅथालॉजी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीत मनासंबंधी सखोल विचार झाला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या संशोधनाबाबत चर्चा होताना दिसते. मात्र आपल्या देशातील मानसशास्त्रात वेगळी दृष्टी होती. आपल्या परंपरेत मनाचा विचार वैज्ञानिक पद्धतीने झाला आहे. त्यामुळे भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड लिखित ‘मन आणि आपण’ या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्याच्या बऱ्याच कृतींचा थेट मनाशी संबंध असतो. प्रत्येकाची वेगवेगळी वृत्ती असते व उपजत स्वभाव असतो. आपल्यासोबतचे चांगले मित्र नेहमी आरसा दाखवितात. मात्र मनात अहंकार असला की व्यक्ती मित्रांचेही ऐकत नाही. यातून ‘मी’पणा वाढतो व तो घातक ठरू शकतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.आयुष्यात वावरत असताना नमते नेमके कुणी घ्यावे, या मुद्यावरून अनेकदा वाद होतात. मीच का नमते घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो आणि यातूनच ‘ब्रेकअप’ होताना दिसतात. अगोदर एकत्र कुटुंबपद्धती होती व त्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लहानपणापासूनच होती.मात्र आताच्या व्यवस्थेत अहंकार योग्य वेळी आवरता कसा घ्यावा, याची सवयच राहिलेली नाही. यापासून सुटका हवी असेल तर आत्मियतेचा परीघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशाचा ‘हॅपीनेस इन्डेक्स’ सातत्याने घसरतो आहे. आपण वेगळ्याच तणावाखाली वावरतो आहे.दुसरीकडे पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा विसर पडतो आहे. अशास्थितीत मानसोपचार तज्ज्ञांनी समाजप्रबोधन करावे, असे डॉ. शेंबेकर यांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांनीदेखील मनोगत मांडले. शिल्पा नंदनपवार यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत