शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:31 IST

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभगवद्गीतेत मांडली आहे मनाची ‘पॅथालॉजी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीत मनासंबंधी सखोल विचार झाला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या संशोधनाबाबत चर्चा होताना दिसते. मात्र आपल्या देशातील मानसशास्त्रात वेगळी दृष्टी होती. आपल्या परंपरेत मनाचा विचार वैज्ञानिक पद्धतीने झाला आहे. त्यामुळे भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड लिखित ‘मन आणि आपण’ या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्याच्या बऱ्याच कृतींचा थेट मनाशी संबंध असतो. प्रत्येकाची वेगवेगळी वृत्ती असते व उपजत स्वभाव असतो. आपल्यासोबतचे चांगले मित्र नेहमी आरसा दाखवितात. मात्र मनात अहंकार असला की व्यक्ती मित्रांचेही ऐकत नाही. यातून ‘मी’पणा वाढतो व तो घातक ठरू शकतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.आयुष्यात वावरत असताना नमते नेमके कुणी घ्यावे, या मुद्यावरून अनेकदा वाद होतात. मीच का नमते घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो आणि यातूनच ‘ब्रेकअप’ होताना दिसतात. अगोदर एकत्र कुटुंबपद्धती होती व त्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लहानपणापासूनच होती.मात्र आताच्या व्यवस्थेत अहंकार योग्य वेळी आवरता कसा घ्यावा, याची सवयच राहिलेली नाही. यापासून सुटका हवी असेल तर आत्मियतेचा परीघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशाचा ‘हॅपीनेस इन्डेक्स’ सातत्याने घसरतो आहे. आपण वेगळ्याच तणावाखाली वावरतो आहे.दुसरीकडे पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा विसर पडतो आहे. अशास्थितीत मानसोपचार तज्ज्ञांनी समाजप्रबोधन करावे, असे डॉ. शेंबेकर यांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांनीदेखील मनोगत मांडले. शिल्पा नंदनपवार यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत