शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर शहरातील विकास कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:02 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देआढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यात नावीन्यपूर्ण योजना, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा, दलित वस्ती सुधार योजना यासह विविध योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण सर्व कामांचा सद्य:स्थितीचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे. तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसात पूर्ण करण्यात येतील, याबाबतची माहिती सादर करावी. प्रत्येक कामाचे छायाचित्र व चलचित्रीकरणासह माहिती द्यावी, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत अभियंता वासनिक, शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर, नगररचनेचे सहायक संचालक गावंडे, हनुमाननगर झोनचे अभियंता बाराहाते, पाणीपुरवठा अभियंता गणवीर, बॅनर्जी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.अखेर कुणासाठी बैठकजिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत ना महापौर आल्या ना आमदार आलेत. रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी मात्र उपस्थित होते. त्यांचा मनपा क्षेत्रात सुरू असलेल्या कामांशी कुठलाही संबंध नव्हता. तरीही ते आलेत. परंतु शहरातील एकही आमदार बैठकीला आले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाºयांनाच प्रश्न केला की, ही बैठक कुणासाठी बोलावण्यात आली आहे. आमदार, महापौर, पदाधिकारी कुणीही उपस्थित नहीत तर मग चर्चा कुणासोबत करणार आणि समस्येचे निराकरण कसे होणार. ही बैठक पुन्हा बोलावण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाguardian ministerपालक मंत्रीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे