शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

उपराजधानीतील ५२ टक्के वृद्ध महिलांच्या अत्याचार व छळाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:16 IST

हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.

ठळक मुद्देहेल्पएज इंडियाचे अध्ययन७२ टक्के वृद्धांना आपल्याच लोकांकडून त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाड, दगड ते जनावरांपर्यंत पूजणारा भारत आपल्याच वृद्धांची काळजी घेत नसल्याचे आजचे धक्कादायक वास्तव आहे. हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.हेल्पएज इंडियाने १५ जून २०१९ रोजी विविध ठिकाणातील वृद्धांशी चर्चा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केलेल्या अध्ययनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या नातेवाईकांकडून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचेही आढळून आले आहे. मुले, सुना, भावंडे, व्याही, भाचे, पुतणे, नोकर किंवा त्यांची देखभाल करणाऱ्यांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. ७२ टक्के वृद्धांना वाईट वागणूक व शिवीगाळ, तर ४३.१ टक्के वृद्धांना हेटाळणी, कुटुंबीयांपासून वेगळे राहावे लागत असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे.अत्याचाऱ्यांपैकी ३२.५ टक्के जवळचे नातेवाईकअध्ययनात पुढे आले आहे की, वृद्धांवर अत्याचार करणाºयांपैकी ३२.५ टक्के हे जवळचे नातेवाईक असतात. यात २१ टक्के मित्रमंडळी आणि २० टक्के शेजारीपाजारी आहेत. यात मारझोड करणे, टोमणे मारणे, वाईट बोलणे, खिल्ली उडवणे, टीव्ही पाहू न देणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नोंदविण्यात आले.२९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ वाटतात ओझे२०१४ च्या सर्वेक्षणात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या होत्या. २०१५ च्या सर्वेक्षणात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. तर २०१९ च्या या सर्वेक्षणात २९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ ओझे वाटत असल्याचे समोर आले आहे.

शहरासोबतच ग्रामीण भागातही भयावह स्थितीज्येष्ठांवर केवळ शहरी भागातच अन्याय होतो असे नाही, तर ग्रामीण भागतही होत असल्याचे भयावह चित्र आहे. शहरातील काही ज्येष्ठ याविरोधात बोलतात तरी, परंतु ग्रामीणमध्ये दुखणे सहनही होत नाही, आणि बोलताही येत नसल्याच्या विचित्र कोंडीत ते सापडले आहेत. वृद्धांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे.-सुनील ठाकूर, वरिष्ठ व्यवस्थापक हेल्पएज इंडिया (विदर्भ) 

टॅग्स :Socialसामाजिक