शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

उपराजधानीतील ५२ टक्के वृद्ध महिलांच्या अत्याचार व छळाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:16 IST

हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.

ठळक मुद्देहेल्पएज इंडियाचे अध्ययन७२ टक्के वृद्धांना आपल्याच लोकांकडून त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाड, दगड ते जनावरांपर्यंत पूजणारा भारत आपल्याच वृद्धांची काळजी घेत नसल्याचे आजचे धक्कादायक वास्तव आहे. हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.हेल्पएज इंडियाने १५ जून २०१९ रोजी विविध ठिकाणातील वृद्धांशी चर्चा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केलेल्या अध्ययनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या नातेवाईकांकडून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचेही आढळून आले आहे. मुले, सुना, भावंडे, व्याही, भाचे, पुतणे, नोकर किंवा त्यांची देखभाल करणाऱ्यांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. ७२ टक्के वृद्धांना वाईट वागणूक व शिवीगाळ, तर ४३.१ टक्के वृद्धांना हेटाळणी, कुटुंबीयांपासून वेगळे राहावे लागत असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे.अत्याचाऱ्यांपैकी ३२.५ टक्के जवळचे नातेवाईकअध्ययनात पुढे आले आहे की, वृद्धांवर अत्याचार करणाºयांपैकी ३२.५ टक्के हे जवळचे नातेवाईक असतात. यात २१ टक्के मित्रमंडळी आणि २० टक्के शेजारीपाजारी आहेत. यात मारझोड करणे, टोमणे मारणे, वाईट बोलणे, खिल्ली उडवणे, टीव्ही पाहू न देणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नोंदविण्यात आले.२९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ वाटतात ओझे२०१४ च्या सर्वेक्षणात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या होत्या. २०१५ च्या सर्वेक्षणात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. तर २०१९ च्या या सर्वेक्षणात २९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ ओझे वाटत असल्याचे समोर आले आहे.

शहरासोबतच ग्रामीण भागातही भयावह स्थितीज्येष्ठांवर केवळ शहरी भागातच अन्याय होतो असे नाही, तर ग्रामीण भागतही होत असल्याचे भयावह चित्र आहे. शहरातील काही ज्येष्ठ याविरोधात बोलतात तरी, परंतु ग्रामीणमध्ये दुखणे सहनही होत नाही, आणि बोलताही येत नसल्याच्या विचित्र कोंडीत ते सापडले आहेत. वृद्धांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे.-सुनील ठाकूर, वरिष्ठ व्यवस्थापक हेल्पएज इंडिया (विदर्भ) 

टॅग्स :Socialसामाजिक