शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील ५२ टक्के वृद्ध महिलांच्या अत्याचार व छळाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:16 IST

हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.

ठळक मुद्देहेल्पएज इंडियाचे अध्ययन७२ टक्के वृद्धांना आपल्याच लोकांकडून त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाड, दगड ते जनावरांपर्यंत पूजणारा भारत आपल्याच वृद्धांची काळजी घेत नसल्याचे आजचे धक्कादायक वास्तव आहे. हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.हेल्पएज इंडियाने १५ जून २०१९ रोजी विविध ठिकाणातील वृद्धांशी चर्चा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केलेल्या अध्ययनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या नातेवाईकांकडून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचेही आढळून आले आहे. मुले, सुना, भावंडे, व्याही, भाचे, पुतणे, नोकर किंवा त्यांची देखभाल करणाऱ्यांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. ७२ टक्के वृद्धांना वाईट वागणूक व शिवीगाळ, तर ४३.१ टक्के वृद्धांना हेटाळणी, कुटुंबीयांपासून वेगळे राहावे लागत असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे.अत्याचाऱ्यांपैकी ३२.५ टक्के जवळचे नातेवाईकअध्ययनात पुढे आले आहे की, वृद्धांवर अत्याचार करणाºयांपैकी ३२.५ टक्के हे जवळचे नातेवाईक असतात. यात २१ टक्के मित्रमंडळी आणि २० टक्के शेजारीपाजारी आहेत. यात मारझोड करणे, टोमणे मारणे, वाईट बोलणे, खिल्ली उडवणे, टीव्ही पाहू न देणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नोंदविण्यात आले.२९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ वाटतात ओझे२०१४ च्या सर्वेक्षणात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या होत्या. २०१५ च्या सर्वेक्षणात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. तर २०१९ च्या या सर्वेक्षणात २९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ ओझे वाटत असल्याचे समोर आले आहे.

शहरासोबतच ग्रामीण भागातही भयावह स्थितीज्येष्ठांवर केवळ शहरी भागातच अन्याय होतो असे नाही, तर ग्रामीण भागतही होत असल्याचे भयावह चित्र आहे. शहरातील काही ज्येष्ठ याविरोधात बोलतात तरी, परंतु ग्रामीणमध्ये दुखणे सहनही होत नाही, आणि बोलताही येत नसल्याच्या विचित्र कोंडीत ते सापडले आहेत. वृद्धांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे.-सुनील ठाकूर, वरिष्ठ व्यवस्थापक हेल्पएज इंडिया (विदर्भ) 

टॅग्स :Socialसामाजिक