शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आमटे दाम्पत्याचे थक्क करणारे अनुभव ऐकून वकील भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:33 IST

हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.

ठळक मुद्देडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुलाखतवकिलांना दिली सेवेची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन शून्यातून विश्व निर्माण केले आहे. हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प त्याची प्रचिती देतो. परंतु, आज जे चित्र दिसत आहे ते त्या काळात नव्हते. आमटे दाम्पत्याने मुलाखतीमध्ये त्यावेळच्या परिस्थितीची माहिती दिल्यानंतर सर्वचजण थक्क झाले. डॉ. प्रकाश यांनी बाबांचे सेवाकार्य पुढे नेण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांना आदिवासींची सेवा करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी सरकारने त्यांना हेमलकसा येथे ५० एकर जागा दिली. त्यावेळी या भागात रोड, वीज, घरे इत्यादी काहीच सुविधा नव्हत्या. अशा परिस्थितीत आमटे दाम्पत्याने विविध अडचणी व संकटांना तोंड देऊन आदिवासी सेवेचे नवीन जग तयार केले. सेवेचा एकमेव विचार डोक्यात असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या सहकाºयांनी अडचणींचा पाढा कधीच वाचला नाही. समोर येणाºया आव्हानांवर मात करीत ते सतत चालत राहिले.लोक बिरादरी प्रकल्पामध्ये आरोग्य सेवा सुरू केल्यानंतर आमटे दाम्पत्याला सर्वप्रथम आदिवासींचे मन वळविण्याचे कार्य करावे लागले. त्यापूर्वी आदिवासी कधीच डॉक्टरकडे गेले नव्हते. त्यांचा तंत्रमंत्र पद्धतीवर विश्वास होता. ते आजार बरा होण्यासाठी बळी देत होते. नरबळीचीही प्रथा होती. त्यामुळे आमटे दाम्पत्याकडे कुणीच उपचारासाठी येत नव्हते. परंतु, त्यांनी मृत्यूशय्येवरील काही रुग्णांना बरे केल्यानंतर आदिवासींचा त्यांच्यावर विश्वास बसला. रुग्णांची संख्या वाढायला लागली.आमटे दाम्पत्याने आदिवासींची सेवा सुरू केली त्यावेळी त्यांच्याकडे निश्चित आराखडा नव्हता. ते सेवा करीत राहिले व त्यांच्या कार्याचा आपोआप विस्तार होत गेला. त्यांच्याकडून उपचार करून गेलेल्या एका रुग्णाचा अंधत्वामुळे मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी डोळ्यांवर उपचार सुरू केले. अज्ञानामुळे आदिवासींची जागोजागी फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, वकील व शिक्षक झाले आहेत. आदिवासींना त्यांच्या अधिकारांबाबत जागृत करण्याचे व त्यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्याचे कार्यही त्यांनी सुरू केले. अशाप्रकारे ते आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता झटायला लागले.श्वेता शेलगावकर यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांनी मानपत्राचे वाचन केले तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.प्रकल्पाला दीड लाखाची देणगीसंघटनेच्या वतीने लोक बिरादरी प्रकल्पाला दीड लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मुलाखतीनंतर आमटे दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर व ज्येष्ठ अधिवक्ता कुमकुम सिरपूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल