शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आमटे दाम्पत्याचे थक्क करणारे अनुभव ऐकून वकील भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:33 IST

हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.

ठळक मुद्देडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुलाखतवकिलांना दिली सेवेची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन शून्यातून विश्व निर्माण केले आहे. हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प त्याची प्रचिती देतो. परंतु, आज जे चित्र दिसत आहे ते त्या काळात नव्हते. आमटे दाम्पत्याने मुलाखतीमध्ये त्यावेळच्या परिस्थितीची माहिती दिल्यानंतर सर्वचजण थक्क झाले. डॉ. प्रकाश यांनी बाबांचे सेवाकार्य पुढे नेण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांना आदिवासींची सेवा करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी सरकारने त्यांना हेमलकसा येथे ५० एकर जागा दिली. त्यावेळी या भागात रोड, वीज, घरे इत्यादी काहीच सुविधा नव्हत्या. अशा परिस्थितीत आमटे दाम्पत्याने विविध अडचणी व संकटांना तोंड देऊन आदिवासी सेवेचे नवीन जग तयार केले. सेवेचा एकमेव विचार डोक्यात असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या सहकाºयांनी अडचणींचा पाढा कधीच वाचला नाही. समोर येणाºया आव्हानांवर मात करीत ते सतत चालत राहिले.लोक बिरादरी प्रकल्पामध्ये आरोग्य सेवा सुरू केल्यानंतर आमटे दाम्पत्याला सर्वप्रथम आदिवासींचे मन वळविण्याचे कार्य करावे लागले. त्यापूर्वी आदिवासी कधीच डॉक्टरकडे गेले नव्हते. त्यांचा तंत्रमंत्र पद्धतीवर विश्वास होता. ते आजार बरा होण्यासाठी बळी देत होते. नरबळीचीही प्रथा होती. त्यामुळे आमटे दाम्पत्याकडे कुणीच उपचारासाठी येत नव्हते. परंतु, त्यांनी मृत्यूशय्येवरील काही रुग्णांना बरे केल्यानंतर आदिवासींचा त्यांच्यावर विश्वास बसला. रुग्णांची संख्या वाढायला लागली.आमटे दाम्पत्याने आदिवासींची सेवा सुरू केली त्यावेळी त्यांच्याकडे निश्चित आराखडा नव्हता. ते सेवा करीत राहिले व त्यांच्या कार्याचा आपोआप विस्तार होत गेला. त्यांच्याकडून उपचार करून गेलेल्या एका रुग्णाचा अंधत्वामुळे मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी डोळ्यांवर उपचार सुरू केले. अज्ञानामुळे आदिवासींची जागोजागी फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, वकील व शिक्षक झाले आहेत. आदिवासींना त्यांच्या अधिकारांबाबत जागृत करण्याचे व त्यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्याचे कार्यही त्यांनी सुरू केले. अशाप्रकारे ते आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता झटायला लागले.श्वेता शेलगावकर यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांनी मानपत्राचे वाचन केले तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.प्रकल्पाला दीड लाखाची देणगीसंघटनेच्या वतीने लोक बिरादरी प्रकल्पाला दीड लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मुलाखतीनंतर आमटे दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर व ज्येष्ठ अधिवक्ता कुमकुम सिरपूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल