शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

विमा नियम उल्लंघनानंतरही भरपाई देणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:51 IST

वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देविमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.खासगी उपयोगाच्या वाहनाचा व्यावसायिक उपयोग करणे आणि वाहनचालकाकडे अधिकृत लायसन्स नसणे यामुळे विमा नियमांचे उल्लंघन झाले. करिता, संबंधित वाहनाच्या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसदारांना भरपाई देता येणार नाही, अशी भूमिका दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘ज्ञानेश्वर आगळे’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता कंपनीची ही भूमिका गुणवत्ताहीन ठरवली आणि विमा नियमांचे उल्लंघन झाले तरी, विमा कंपनीला तृतीय पक्षास भरपाई नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, तृतीय पक्षास दिलेली भरपाईची रक्कम कंपनीला वाहन मालकाकडून वसूल करता येईल, असेही सांगितले.वारसदारांना ८.२२ लाख रुपये भरपाईवाहन अपघातात मृत्यू झालेल्या बेबी गवई यांचे पती रामभाऊ व दोन मुलांना (जि. अमरावती) उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ८ लाख २२ हजार रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. ही रक्कम तीन महिन्यात अदा करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने या वारसदारांना भरपाईसाठी अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. संबंधित अपघात ३१ मार्च २००५ रोजी घडला होता.

 

 

टॅग्स :Courtन्यायालय