शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

विमा नियम उल्लंघनानंतरही भरपाई देणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:51 IST

वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देविमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.खासगी उपयोगाच्या वाहनाचा व्यावसायिक उपयोग करणे आणि वाहनचालकाकडे अधिकृत लायसन्स नसणे यामुळे विमा नियमांचे उल्लंघन झाले. करिता, संबंधित वाहनाच्या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसदारांना भरपाई देता येणार नाही, अशी भूमिका दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘ज्ञानेश्वर आगळे’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता कंपनीची ही भूमिका गुणवत्ताहीन ठरवली आणि विमा नियमांचे उल्लंघन झाले तरी, विमा कंपनीला तृतीय पक्षास भरपाई नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, तृतीय पक्षास दिलेली भरपाईची रक्कम कंपनीला वाहन मालकाकडून वसूल करता येईल, असेही सांगितले.वारसदारांना ८.२२ लाख रुपये भरपाईवाहन अपघातात मृत्यू झालेल्या बेबी गवई यांचे पती रामभाऊ व दोन मुलांना (जि. अमरावती) उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ८ लाख २२ हजार रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. ही रक्कम तीन महिन्यात अदा करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने या वारसदारांना भरपाईसाठी अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. संबंधित अपघात ३१ मार्च २००५ रोजी घडला होता.

 

 

टॅग्स :Courtन्यायालय