शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विमा नियम उल्लंघनानंतरही भरपाई देणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:51 IST

वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देविमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन अपघाताची झळ पोहचलेल्या तृतीय पक्षास वाहन विमा नियमांचे उल्लंघन झाल्यानंतरही भरपाई देणे आवश्यक आहे, हे विमा कंपनीचे वैधानिक कर्तव्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी एका प्रकरणात दिला.खासगी उपयोगाच्या वाहनाचा व्यावसायिक उपयोग करणे आणि वाहनचालकाकडे अधिकृत लायसन्स नसणे यामुळे विमा नियमांचे उल्लंघन झाले. करिता, संबंधित वाहनाच्या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसदारांना भरपाई देता येणार नाही, अशी भूमिका दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘ज्ञानेश्वर आगळे’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता कंपनीची ही भूमिका गुणवत्ताहीन ठरवली आणि विमा नियमांचे उल्लंघन झाले तरी, विमा कंपनीला तृतीय पक्षास भरपाई नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, तृतीय पक्षास दिलेली भरपाईची रक्कम कंपनीला वाहन मालकाकडून वसूल करता येईल, असेही सांगितले.वारसदारांना ८.२२ लाख रुपये भरपाईवाहन अपघातात मृत्यू झालेल्या बेबी गवई यांचे पती रामभाऊ व दोन मुलांना (जि. अमरावती) उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ८ लाख २२ हजार रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. ही रक्कम तीन महिन्यात अदा करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने या वारसदारांना भरपाईसाठी अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. संबंधित अपघात ३१ मार्च २००५ रोजी घडला होता.

 

 

टॅग्स :Courtन्यायालय