शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:07 IST

रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघात प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.तिवसा, जि. अमरावती येथील आकाश ठाकूर २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने नागपूर ते चांदूररेल्वे असा प्रवास करीत होता. रेल्वे डब्यात गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, अचानक धक्का लागल्यामुळे तो खाली कोसळून मरण पावला. पंचनाम्यात त्याच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही. परिणामी, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने आकाशचे आई-वडील मेघा व विजय ठाकूर यांचा भरपाईचा दावा खारीज केला होता. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश लक्षात घेता हा सुधारित निर्वाळा दिला.प्रवाशाने रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे राहणे ही फौजदारी कृ ती नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. करिता असा प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे खाली पडून मरण पावल्यास भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. तसेच, मयत प्रवाशाकडे रेल्वेचे अधिकृ त तिकीट आढळून आले नाही तरी, भरपाई देणे आवश्यक आहे. कारण, अपघात झाल्यानंतर प्रवाशाकडील रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने हा निर्वाळा देताना स्पष्ट केले.आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे मेघा व विजय ठाकूर यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्यांना ही रक्कम चार महिन्यात अदा करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. तसेच, रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा अवैध निर्णय रद्द करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय