शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:07 IST

रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघात प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.तिवसा, जि. अमरावती येथील आकाश ठाकूर २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने नागपूर ते चांदूररेल्वे असा प्रवास करीत होता. रेल्वे डब्यात गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, अचानक धक्का लागल्यामुळे तो खाली कोसळून मरण पावला. पंचनाम्यात त्याच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही. परिणामी, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने आकाशचे आई-वडील मेघा व विजय ठाकूर यांचा भरपाईचा दावा खारीज केला होता. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश लक्षात घेता हा सुधारित निर्वाळा दिला.प्रवाशाने रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे राहणे ही फौजदारी कृ ती नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. करिता असा प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे खाली पडून मरण पावल्यास भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. तसेच, मयत प्रवाशाकडे रेल्वेचे अधिकृ त तिकीट आढळून आले नाही तरी, भरपाई देणे आवश्यक आहे. कारण, अपघात झाल्यानंतर प्रवाशाकडील रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने हा निर्वाळा देताना स्पष्ट केले.आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे मेघा व विजय ठाकूर यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्यांना ही रक्कम चार महिन्यात अदा करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. तसेच, रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा अवैध निर्णय रद्द करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय