शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:07 IST

रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघात प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.तिवसा, जि. अमरावती येथील आकाश ठाकूर २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने नागपूर ते चांदूररेल्वे असा प्रवास करीत होता. रेल्वे डब्यात गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, अचानक धक्का लागल्यामुळे तो खाली कोसळून मरण पावला. पंचनाम्यात त्याच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही. परिणामी, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने आकाशचे आई-वडील मेघा व विजय ठाकूर यांचा भरपाईचा दावा खारीज केला होता. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश लक्षात घेता हा सुधारित निर्वाळा दिला.प्रवाशाने रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे राहणे ही फौजदारी कृ ती नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. करिता असा प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे खाली पडून मरण पावल्यास भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. तसेच, मयत प्रवाशाकडे रेल्वेचे अधिकृ त तिकीट आढळून आले नाही तरी, भरपाई देणे आवश्यक आहे. कारण, अपघात झाल्यानंतर प्रवाशाकडील रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने हा निर्वाळा देताना स्पष्ट केले.आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे मेघा व विजय ठाकूर यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्यांना ही रक्कम चार महिन्यात अदा करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. तसेच, रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा अवैध निर्णय रद्द करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय