शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

प्रवाशाने निष्काळजीपणा केला तरी भरपाई नाकारता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:07 IST

रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघात प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.तिवसा, जि. अमरावती येथील आकाश ठाकूर २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने नागपूर ते चांदूररेल्वे असा प्रवास करीत होता. रेल्वे डब्यात गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, अचानक धक्का लागल्यामुळे तो खाली कोसळून मरण पावला. पंचनाम्यात त्याच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही. परिणामी, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने आकाशचे आई-वडील मेघा व विजय ठाकूर यांचा भरपाईचा दावा खारीज केला होता. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश लक्षात घेता हा सुधारित निर्वाळा दिला.प्रवाशाने रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे राहणे ही फौजदारी कृ ती नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. करिता असा प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे खाली पडून मरण पावल्यास भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. तसेच, मयत प्रवाशाकडे रेल्वेचे अधिकृ त तिकीट आढळून आले नाही तरी, भरपाई देणे आवश्यक आहे. कारण, अपघात झाल्यानंतर प्रवाशाकडील रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने हा निर्वाळा देताना स्पष्ट केले.आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे मेघा व विजय ठाकूर यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्यांना ही रक्कम चार महिन्यात अदा करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. तसेच, रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा अवैध निर्णय रद्द करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय