शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

करुणेचे वैश्विकीकरण व्हावे : सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 01:05 IST

मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंवाद नोबेल विजेते कैलाश सत्यार्थींसोबत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.प्रभा खेतान फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. ही मुलाखत वर्तमानातील प्रख्यात कवी यतिंद्र मिश्र यांनी घेतली. सत्यार्थी यांनी बालकांच्या भावनेवर आपले विचार व्यक्त केले. एखाद्या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलल्या जाणे मला विचलित करते. मनातील त्याच हलकल्लोळातून आपल्या काही सहकाऱ्यांसह १९८१ मध्ये ‘बालपण वाचवा आंदोलन’ सुरू केले होते. त्याच अनुषंगाने बालमजुरी, शोषण, गरिबीच्या बाहेर मुलांना काढणे व बाल अधिकारांकरिता कायदेशीर लढाईकरिता पत्नी सुमेधाचे दागिनेही विकावे लागल्याचे सत्यार्थी म्हणाले. सत्यार्थी यांच्या चमूने आजतागायत ९० हजार मुलांना नरकयुक्त जीवनातून यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे. ते म्हणतात, ‘अन्याय-अत्याचाराविरोधात क्रोध निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच परिवर्तन होईल.’ पूर्वाश्रमीचे कैलाश शर्मा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी कैलाश सत्यार्थी हे नामकरण करवून घेतले. सत्यार्थी वर्तमानात संयुक्त राष्ट्रसंघ आणि जी-२० देशांमधील वंचितांकरिता निधी एकत्रित करण्याच्या अभियानात सहभागी आहेत. या कार्यक्रमाचे सहआयोजक ‘अहसास वुमन’ होते तर ‘लोकमत’ मीडिया पार्टनर होते. श्री सिमेंटकडून या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ‘अहसास वुमन’च्या प्रणिम बब्बर यांनी सर्वांचे स्वागत केले.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार