शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक प्रयत्नांनी कमी होईल कॉर्बनचे उत्सर्जन : विक्रम किर्लोस्कर यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 21:30 IST

रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच कॉर्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले.

ठळक मुद्देव्हीएनआयटीतर्फे व्याख्यान

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कॉर्बनचे उत्सर्जन (एमिशन) ही आज जगाला भेडसावणारी समस्या आहे. सातत्याने वाढते तापमान, वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉर्बन फूटप्रिन्ट कमी करण्यासाठी उद्योगांवर मोठी जबाबदारी आली आहे. मात्र अमुक तंत्रज्ञान वापराने कॉर्बन उत्सर्जन कमी होईल, असे सांगणे हास्यास्पद ठरेल. यासाठी प्रत्येकाने रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच हे शक्य होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले.विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत शनिवारी ‘कॉर्बन धोरण : काळाची गरज’ या विषयावर किर्लोस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार आणि संचालक प्रा. प्रमोद पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते. विक्रम किर्लोस्कर यांनी कॉर्बन उत्सर्जनाच्या वर्तमान परिस्थितीवर प्रकाश टाकला. आपल्या देशात सर्वाधिक ५० टक्के कार्बन उत्सर्जन औष्णिक ऊर्जा प्रकल्पामधून होते आणि चिंताजनक म्हणजे ऊर्जेची सर्वाधिक ७६ टक्के गरज कोळशावरच अवलंबून आहे. त्याखालोखाल २० टक्के कार्बन उत्सर्जन वाहनांमुळे होते. यामध्ये सर्वाधिक पेट्रोल वाहन, त्याखाली इलेक्ट्रीक वाहने आणि सर्वात कमी उत्सर्जन आधुनिक हायब्रीड वाहनांमुळे होते. मात्र हायब्रीड वाहनांचे चलन आपल्या देशात अद्याप यायचे आहे. उर्वरीत प्रदूषण हे उद्योग आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीमुळे होते. चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे भविष्यात किंवा २०५० पर्यंतच ऊर्जेची गरज तिपटीने वाढणार असून कोळशाऐवजी पर्यावरणपूरक पर्यायाबाबतची उपलब्धता अद्यापही समाधानकारक नाही. त्यामुळे प्रदूषणाचे किती संकट झेलावे लागणार आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.किर्लोस्कर पुढे म्हणाले, शासनातर्फे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अमुक तंत्रज्ञान वापरा, अशा सूचना केल्या जातात. मात्र त्यापेक्षा सरकारने कार्बन फूटप्रिन्टचे प्रमाण किती आहे आणि किती टक्के कमी करायचे आहे, याबाबत सूचित करायला हवे. त्यांनी स्वत:च्या कंपनीचे उदाहरण सादर केले. गेल्या ५ वर्षात कंपनीने स्वत: पुढाकार घेउन प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे त्या परिसरातील जलस्तर १५ मीटरने वाढल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यावेळी कृषी कचरा जाळण्याबाबतही धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याशिवाय नागरिकांनीही दैनंदिन सवयीमध्ये पर्यावरणपूरक बदल केल्यास मोठी मदत होईल, असे मत व्यक्त करीत तरुणांनी या दृष्टीने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नीरा धाबू यांनी केले तर प्रा. डी. आर. पेशवे यांनी आभार मानले.

टॅग्स :environmentपर्यावरणcommunityसमाज