शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जीवनात विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वाचे : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:55 IST

सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.

ठळक मुद्दे‘संवाद’ विषयावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष डॉ. सुरेश राठी, विशेष अतिथी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, शेफ विष्णू मनोहर, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, समन्वयक विजय जथे आणि आयोजक मनीषा बावनकर उपस्थित होते.संवाद कौशल्यावर बोलताना सुरेश राठी म्हणाले, मानवजातीचा विकास मुख्यत्वे मनुष्यामधील कुशल संवादामुळे होतो. संवाद जीवनातील आवश्यक भाग आणि एक सामाजिक कौशल्य आहे. श्वेता शेलगावकर म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात बोलताना विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये कुशलता आवश्यक आहे. ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक किशन शर्मा यांनी योग्य संवाद आणि भाषेचे महत्त्व सांगितले आणि या क्षेत्रातील अनुभव कथन केले. विष्णू मनोहर यांनी टीव्ही, लाईव्ह अँकरिंग, न्यूज रीडर आणि मुलाखतीचे महत्त्व सांगितले. स्टॅण्डअप कॉमेडी व समालोचन यावर विशेष सत्र घेतले. या सत्राला प्रेक्षकांनी दाद दिली.कार्यक्रमात आकार गु्रप ऑफ इन्स्टिट्युशन्स, हिंगणा, अ‍ॅप्टेक एव्हिएशन अकॅडमी, आदर्श विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, संताजी कॉलेज, धनवटे नॅशनल कॉलेज, एलएडी कॉलेज सेमिनरी हिल्स, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि सेवादल कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपीय कार्यक्रमात विष्णू मनोहर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी ज्योती बावनकुळे, नीलिमा बावणे, वंदना शर्मा आणि भास्कर रागीट उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक विजय जथे यांनी तर आयोजन मास्क इव्हेंट ऑर्गनायझर व लाईफ स्टाईल स्टोअरच्या संचालिका मनीषा बावनकर यांनी केले. आभार मनीषा बावनकर यांनी मानले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर