शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जीवनात विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वाचे : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:55 IST

सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.

ठळक मुद्दे‘संवाद’ विषयावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष डॉ. सुरेश राठी, विशेष अतिथी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, शेफ विष्णू मनोहर, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, समन्वयक विजय जथे आणि आयोजक मनीषा बावनकर उपस्थित होते.संवाद कौशल्यावर बोलताना सुरेश राठी म्हणाले, मानवजातीचा विकास मुख्यत्वे मनुष्यामधील कुशल संवादामुळे होतो. संवाद जीवनातील आवश्यक भाग आणि एक सामाजिक कौशल्य आहे. श्वेता शेलगावकर म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात बोलताना विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये कुशलता आवश्यक आहे. ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक किशन शर्मा यांनी योग्य संवाद आणि भाषेचे महत्त्व सांगितले आणि या क्षेत्रातील अनुभव कथन केले. विष्णू मनोहर यांनी टीव्ही, लाईव्ह अँकरिंग, न्यूज रीडर आणि मुलाखतीचे महत्त्व सांगितले. स्टॅण्डअप कॉमेडी व समालोचन यावर विशेष सत्र घेतले. या सत्राला प्रेक्षकांनी दाद दिली.कार्यक्रमात आकार गु्रप ऑफ इन्स्टिट्युशन्स, हिंगणा, अ‍ॅप्टेक एव्हिएशन अकॅडमी, आदर्श विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, संताजी कॉलेज, धनवटे नॅशनल कॉलेज, एलएडी कॉलेज सेमिनरी हिल्स, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि सेवादल कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपीय कार्यक्रमात विष्णू मनोहर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी ज्योती बावनकुळे, नीलिमा बावणे, वंदना शर्मा आणि भास्कर रागीट उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक विजय जथे यांनी तर आयोजन मास्क इव्हेंट ऑर्गनायझर व लाईफ स्टाईल स्टोअरच्या संचालिका मनीषा बावनकर यांनी केले. आभार मनीषा बावनकर यांनी मानले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर