शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नागपुरातील क्रीडा संकुल, रेशीमबाग मैदानाचा व्यावसायिक उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:29 IST

मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यातील मुद्दे लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : उत्तर देण्याचा शासनाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यातील मुद्दे लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.कस्तूरचंद पार्क मैदानाच्या दूरवस्थेसंदर्भातील प्रकरणात न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी हा अर्ज दाखल केला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, या अर्जासह मनपाच्या हेरिटेज समितीशी संबंधित मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. समितीच्या अध्यक्षांचे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. तसेच, समितीच्या काही सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब रेकॉर्डवर घेऊन मनपाला चार आठवड्यांमध्ये अध्यक्ष व नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.पार्किंगपूर्वी परवानगी घेण्याची ग्वाहीविधिमंडळ अधिवेशन काळात नागपुरात येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी शासन कस्तूरचंद पार्क येथील जागा आरक्षित करते. कस्तूरचंद पार्क हेरिटेज आहे. त्यामुळे या ठिकाणी जड वाहने पार्क करता येत नाही. न्यायालयाने गेल्या तारखेला याबाबत काही धोरण आहे काय अशी विचारणा शासनाला केली होती. त्यावर भूमिका मांडताना शासनाने यापुढे हेरिटेज समितीची परवानगी मिळाल्यानंतरच कस्तूरचंद पार्कवर अधिकाऱ्यांची वाहने पार्क करू, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क