शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:19 IST

सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस, आरोग्य अधिकारी तेथे पोहोचले. अर्ध्या डझन बसही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथे दाखल झाल्या. ‘दोन तासाचा वेळ आहे, ज्यांना स्वेच्छेने क्वारंटाईन व्हायचे आहे, त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह साहित्य घेऊन बसमध्ये बसावे’ असे प्रशासनाने आवाहन केले. मात्र त्यानंतर एकही नागरिक स्वेच्छेने पुढे आला नाही. त्यामुळे प्रशासनाला आल्या पावली परतावे लागले.सतरंजीपुरा येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रशासनातर्फे कोणतेही लिखित पत्र वा नोटीस दिलेली नव्हती. केवळ काही तासाच्या आधी येऊन क्वारंटाईन होण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्वारंटाईन करावयाचे असल्यास जबरदस्तीने उचलून घेऊन जावे, आम्ही स्वत:हून येणार नाही अशी ताठर भूमिका नागरिकांनी घेतली. सतरंजीपुऱ्यातील तेलंगीपुरा आणि आदिवासी वसतिगृहाच्या आसपास रुग्ण आढळून आला नाही आणि संक्रमण पसरण्याचीही काही शक्यता नाही, असे नागरिकांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सतरंजीपुरा येथे लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहन केले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही क्वारंटाईनसाठी तयार झाले नसल्याची माहिती आहे. नगरसेवक नितीन साठवणे यांनी सांगितले की, ‘प्रशासनातर्फे नागरिकांना स्वेच्छेने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत:ही लोकांना समजावले. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही तयार झाला नाही.’पाणी, विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकीसूत्रानुसार, क्वारंटाईन करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तेथील नागरिकांना धमकी दिली. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ‘जे करायचे ते जबरदस्तीने करा, स्वेच्छेने आम्ही क्वारंटाईन होणार नाही. यापूर्वीही अनेक नागरिक क्वारंटाईन झाले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे’ असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर