शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:19 IST

सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस, आरोग्य अधिकारी तेथे पोहोचले. अर्ध्या डझन बसही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथे दाखल झाल्या. ‘दोन तासाचा वेळ आहे, ज्यांना स्वेच्छेने क्वारंटाईन व्हायचे आहे, त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह साहित्य घेऊन बसमध्ये बसावे’ असे प्रशासनाने आवाहन केले. मात्र त्यानंतर एकही नागरिक स्वेच्छेने पुढे आला नाही. त्यामुळे प्रशासनाला आल्या पावली परतावे लागले.सतरंजीपुरा येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रशासनातर्फे कोणतेही लिखित पत्र वा नोटीस दिलेली नव्हती. केवळ काही तासाच्या आधी येऊन क्वारंटाईन होण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्वारंटाईन करावयाचे असल्यास जबरदस्तीने उचलून घेऊन जावे, आम्ही स्वत:हून येणार नाही अशी ताठर भूमिका नागरिकांनी घेतली. सतरंजीपुऱ्यातील तेलंगीपुरा आणि आदिवासी वसतिगृहाच्या आसपास रुग्ण आढळून आला नाही आणि संक्रमण पसरण्याचीही काही शक्यता नाही, असे नागरिकांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सतरंजीपुरा येथे लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहन केले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही क्वारंटाईनसाठी तयार झाले नसल्याची माहिती आहे. नगरसेवक नितीन साठवणे यांनी सांगितले की, ‘प्रशासनातर्फे नागरिकांना स्वेच्छेने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत:ही लोकांना समजावले. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही तयार झाला नाही.’पाणी, विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकीसूत्रानुसार, क्वारंटाईन करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तेथील नागरिकांना धमकी दिली. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ‘जे करायचे ते जबरदस्तीने करा, स्वेच्छेने आम्ही क्वारंटाईन होणार नाही. यापूर्वीही अनेक नागरिक क्वारंटाईन झाले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे’ असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर