शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:19 IST

सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस, आरोग्य अधिकारी तेथे पोहोचले. अर्ध्या डझन बसही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथे दाखल झाल्या. ‘दोन तासाचा वेळ आहे, ज्यांना स्वेच्छेने क्वारंटाईन व्हायचे आहे, त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह साहित्य घेऊन बसमध्ये बसावे’ असे प्रशासनाने आवाहन केले. मात्र त्यानंतर एकही नागरिक स्वेच्छेने पुढे आला नाही. त्यामुळे प्रशासनाला आल्या पावली परतावे लागले.सतरंजीपुरा येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रशासनातर्फे कोणतेही लिखित पत्र वा नोटीस दिलेली नव्हती. केवळ काही तासाच्या आधी येऊन क्वारंटाईन होण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्वारंटाईन करावयाचे असल्यास जबरदस्तीने उचलून घेऊन जावे, आम्ही स्वत:हून येणार नाही अशी ताठर भूमिका नागरिकांनी घेतली. सतरंजीपुऱ्यातील तेलंगीपुरा आणि आदिवासी वसतिगृहाच्या आसपास रुग्ण आढळून आला नाही आणि संक्रमण पसरण्याचीही काही शक्यता नाही, असे नागरिकांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सतरंजीपुरा येथे लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहन केले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही क्वारंटाईनसाठी तयार झाले नसल्याची माहिती आहे. नगरसेवक नितीन साठवणे यांनी सांगितले की, ‘प्रशासनातर्फे नागरिकांना स्वेच्छेने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत:ही लोकांना समजावले. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही तयार झाला नाही.’पाणी, विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकीसूत्रानुसार, क्वारंटाईन करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तेथील नागरिकांना धमकी दिली. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ‘जे करायचे ते जबरदस्तीने करा, स्वेच्छेने आम्ही क्वारंटाईन होणार नाही. यापूर्वीही अनेक नागरिक क्वारंटाईन झाले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे’ असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर