शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प : रंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील उडाले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:17 IST

Lockdown, Colour Trade stalled २८ मार्चला होलिका दहन आणि २९ मार्चला धुळवड आहे. कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे.

ठळक मुद्देगोदामांत पडलीय कोट्यवधींची सामग्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २८ मार्चला होलिका दहन आणि २९ मार्चला धुळवड आहे. कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे. गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांचे रंग-गुलाल, पिचकारी, मुखवटे, पोंगे आदी पडलेले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेले आहेत. साठवणूकदरांचा किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क होत नाही. खरेदी केल्यानंतर गुंतवणूक तरी निघेल का, हा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहे. अशा संभ्रमावस्थेमुळे सर्वच बेजार झाले आहेत.

२१ मार्चनंतर टाळेबंदी आणखी वाढली तरी ठोक व्यापाऱ्यांचा तोटा निश्चित आहे. डिसेंबरपर्यंत कोरोना नियंत्रणाची शक्यता वाढल्यामुळे, अन्य जिल्ह्यांतून रंग व गुलालाची सामग्री मागवण्यात आली होती. परंतु, ऐन उत्सवाच्या काळात पुन्हा टाळेबंदी झाली आणि व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. २२ मार्चनंतर टाळेबंदी संपेल आणि बाजारपेठा उघडल्यावर किमान गुंतवणूक तरी निघेल, अशी अपेक्षा व्यापारी करत आहेत.

ॲडव्हान्स आधीच दिला

रंगांचे ठोक व्यापारी श्वेतांग खोब्रागडे यांनी सांगितल्यानुसार, कोरोना संक्रमणामुळे व्यापारातील व्यवहारात परिवर्तन आले आहे. सामग्रीसाठी ॲडव्हान्स देणे गरजेचे असते. दिवाळीनंतर होळीची तयारी सुरू होत असते. रंगांचे निर्माण आणि व्यवसाय सुरू होतो. डिसेंबरपासून ठोक व्यापाऱ्यांनी सोलापूर आदी ठिकाणांहून रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे आदी मागवण्यास सुरुवात केली होती. त्याचे पेमेंटही दिले गेले आहे. आता व्यापारच बंद पडल्याने लागत काढणेही कठीण झाले आहे.

दुसऱ्या जिल्ह्यांतून व्यापारी येण्यास कचरत आहेत

नागपुरात स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच नजीकच्या जिल्ह्यांतून किरकोळ व्यापारी रंग आणि अन्य सामग्री घेण्यास येत असतात. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कठोर निर्देश दिले असल्याने, अन्य राज्यांतील व्यापारीही नागपुरात पोहोचत नाहीत. स्थानिक किरकोळ व्यापारीही टाळेबंदी संपण्याची वाट बघत आहेत.

१० टक्क्यांचीसुद्धा विक्री नाही

होळीपूर्वी दोन महिने आधी रंगांचा व्यापार सुरू होत असतो. किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असतात. दोन आठवड्यापूर्वी खरेदी-विक्रीला गती प्राप्त होते. पंरतु, कोरोनामुळे यंदा दहा टक्केही व्यवहार झालेले नाहीत. ९० टक्के सामग्री ठोक व्यापाऱ्यांकडेच पडून आहे.

टॅग्स :HoliहोळीMarketबाजार