शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर महाविद्यालयांनी घेतली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:20 IST

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमनमानी पद्धतीने केंद्र ठरविल्याचा आरोप अर्जात गडबड होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांना फायदा होण्यासाठी केंद्रात विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या भाग २ मध्ये गडबड केली जाऊ शकत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. शंका व्यक्त करणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना भेटण्याची तयारी करीत आहेत.कार्यालयाने काही दिवसांपूर्वी ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी झोननुसार मुख्य व मार्गदर्शन केंद्र ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतून अप्लीकेशन किट घेण्यास सांगण्यात आले आहे; सोबतच केंद्रात जाऊन आधी अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर अर्ज २ विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्न उपस्थित करणाºया कॉलेजच्या मते फॉर्म २ भरताना केंद्रात गडबड करण्यात येते. मागील वर्षीही अशीच गडबड झाली होती. फॉर्म २ मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या इच्छेशिवाय कॉलेजचे कोड देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळु शकला नाही. यावेळीही असेच होण्याची शक्यता आहे. यावेळी दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. यामुळे काही आॅनलाईन अर्जाच्या केंद्रासोबत साटेलोटे करून विद्यार्थ्यांच्या अर्जात गडबड करू शकत असल्याचे काही कॉलेजने म्हटले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ११ वीच्या अर्जासाठी केंद्र ठरविताना कोणत्याच कॉलेजकडे विचारणा केली नसल्यामुळे कॉलेजने शंका व्यक्त केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र