शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर महाविद्यालयांनी घेतली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:20 IST

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमनमानी पद्धतीने केंद्र ठरविल्याचा आरोप अर्जात गडबड होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांना फायदा होण्यासाठी केंद्रात विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या भाग २ मध्ये गडबड केली जाऊ शकत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. शंका व्यक्त करणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना भेटण्याची तयारी करीत आहेत.कार्यालयाने काही दिवसांपूर्वी ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी झोननुसार मुख्य व मार्गदर्शन केंद्र ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतून अप्लीकेशन किट घेण्यास सांगण्यात आले आहे; सोबतच केंद्रात जाऊन आधी अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर अर्ज २ विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्न उपस्थित करणाºया कॉलेजच्या मते फॉर्म २ भरताना केंद्रात गडबड करण्यात येते. मागील वर्षीही अशीच गडबड झाली होती. फॉर्म २ मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या इच्छेशिवाय कॉलेजचे कोड देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळु शकला नाही. यावेळीही असेच होण्याची शक्यता आहे. यावेळी दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. यामुळे काही आॅनलाईन अर्जाच्या केंद्रासोबत साटेलोटे करून विद्यार्थ्यांच्या अर्जात गडबड करू शकत असल्याचे काही कॉलेजने म्हटले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ११ वीच्या अर्जासाठी केंद्र ठरविताना कोणत्याच कॉलेजकडे विचारणा केली नसल्यामुळे कॉलेजने शंका व्यक्त केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र