शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य महाविद्यालयांनी आर्थिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा :नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:45 IST

    लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध ...

ठळक मुद्दे लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकासावर मार्गदर्शन

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावता येते. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स(मास्वे)च्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकास या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर मास्वेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, अध्यक्ष डॉ. दीपक वलोकर, सचिव डॉ. अनंत बरडे, डॉ. दिलीप बाराहाते, डॉ. विजय शिंगणापूरे, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गडचिरोलीला बायो एव्हीएशन फ्युएल हब म्हणून विकसित करण्यात येत आहे. डेहराडून ते दिल्ली स्पाईस जेट विमानात २५ टक्के जैविक इंधन वापरून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या भागात जट्रोफा, रतनज्योत, करंज यासारख्या जैविक इंधन देणाऱ्या वनस्पतींची उत्पादन वाढविण्यात येत आहे. यामुळे नागरी उड्डयण क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माळरानावर या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. यात सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे. समाजकार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना जट्रोफा, बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नागपुरात जैविक इंधनावर ३५ बसेस चालविण्यात येत आहेत. यात ट्रॅक्टरमध्ये हे इंधन वापरल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे १५ ते १६ हजाराची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात समाजकार्य शिक्षण आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या विषयावर बोलताना जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी समाजकार्य पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नागरिक, प्रशासनात दुवा म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. मुरली देसाई यांनी समाजकार्य महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र अमरावतीच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी समाजकार्य महाविद्यालयात ग्रामीण विकासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन डॉ. जॉन मेनाचेरी यांनी केले. आभार डॉ. शिवपुत्र कुंभार यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsocial workerसमाजसेवक