शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

समाजकार्य महाविद्यालयांनी आर्थिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा :नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:45 IST

    लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध ...

ठळक मुद्दे लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकासावर मार्गदर्शन

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावता येते. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स(मास्वे)च्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकास या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर मास्वेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, अध्यक्ष डॉ. दीपक वलोकर, सचिव डॉ. अनंत बरडे, डॉ. दिलीप बाराहाते, डॉ. विजय शिंगणापूरे, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गडचिरोलीला बायो एव्हीएशन फ्युएल हब म्हणून विकसित करण्यात येत आहे. डेहराडून ते दिल्ली स्पाईस जेट विमानात २५ टक्के जैविक इंधन वापरून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या भागात जट्रोफा, रतनज्योत, करंज यासारख्या जैविक इंधन देणाऱ्या वनस्पतींची उत्पादन वाढविण्यात येत आहे. यामुळे नागरी उड्डयण क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माळरानावर या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. यात सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे. समाजकार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना जट्रोफा, बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नागपुरात जैविक इंधनावर ३५ बसेस चालविण्यात येत आहेत. यात ट्रॅक्टरमध्ये हे इंधन वापरल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे १५ ते १६ हजाराची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात समाजकार्य शिक्षण आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या विषयावर बोलताना जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी समाजकार्य पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नागरिक, प्रशासनात दुवा म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. मुरली देसाई यांनी समाजकार्य महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र अमरावतीच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी समाजकार्य महाविद्यालयात ग्रामीण विकासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन डॉ. जॉन मेनाचेरी यांनी केले. आभार डॉ. शिवपुत्र कुंभार यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsocial workerसमाजसेवक