शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अभियांत्रिकीच्या जागांसाठी कॉलेजकडून ‘सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 10:32 IST

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील महाविद्यालयांना रिक्त जागांची चिंता सतावत आहे. ‘कॅप’च्या प्रथम फेरीला सुरुवात होण्याअगोदरच काही महाविद्यालयांनी चक्क जागांचा ‘सेल’च मांडला आहे.

ठळक मुद्देकमी शुल्कात प्रवेश देण्याच्या ‘ऑफर्स’ अनेकांची कागदपत्रे अगोदरच ठेवली घेऊन काही अभियांत्रिकी महाविद्यालयांतील चित्र

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील महाविद्यालयांना रिक्त जागांची चिंता सतावत आहे. ‘कॅप’च्या प्रथम फेरीला सुरुवात होण्याअगोदरच काही महाविद्यालयांनी चक्क जागांचा ‘सेल’च मांडला आहे. विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रवेश देण्याच्या ‘ऑफर्स’ देण्यात येत आहेत व त्यांच्याकडून कागदपत्रे अगोदरच घेण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही महाविद्यालयांकडून असे प्रकार सुरू असून यासाठी ‘एजंट्स’देखील नेमण्यात आले आहेत.काही वर्षांपासून सातत्याने अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहत आहेत. शहरातील काही महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी वेगळाच प्रकार सुरू केला आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संपर्क केला. बाहेरील राज्यातदेखील त्यांनी ‘एजंट्स’च्या माध्यमातून ‘नेटवर्क’ प्रस्थापित केले. एरवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गात साधारणत: ८० हजारांच्या आसपास शुल्क द्यावे लागते. मात्र या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना ‘ऑफर्स’ देणे सुरू आहे. अर्धे शुल्कच द्या व प्रवेश घ्या, असे विद्यार्थी व पालकांना सांगण्यात येत आहे. याशिवाय वसतिगृहात राहण्याच्या व जेवण्याच्या खर्चातदेखील भरमसाठ सूट देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. एका महाविद्यालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी तर केवळ आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचेच अशा प्रकारे प्रवेश घेण्यात येत आहेत व त्यांनादेखील अशाच ‘आॅफर्स’ देण्यात येत आहेत.

चांगल्या महाविद्यालयांचे दरवाजे बंदएका महाविद्यालयाने बारावीचा तसेच ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल लागण्याअगोदरच गोंदिया जिल्हा तसेच मध्य प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे अगोदरच ठेवून घेतली. यातील काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. परंतु कागदपत्रेच अगोदर दिल्याने चांगल्या व दर्जेदार महाविद्यालयांतील प्रवेशाचे त्यांचे दरवाजे बंद झाले आहेत.

...मग जेवणात मिळतो मसालेभातप्रवेशासाठी ‘ऑफर्स’ देणाऱ्या महाविद्यालयातील एका प्राध्यापकाशी संपर्क केला असता त्याने धक्कादायक माहितीच दिली. वसतिगृहात राहणे व खाण्याच्या शुल्कात सूट देण्यात येते. मात्र महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आठवड्यातील तीन ते चार दिवस विद्यार्थ्यांना केवळ मसालेभातच देण्यात येतो. विद्यार्थी याबद्दल मग दाददेखील मागण्यास घाबरतात.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र