शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 12:24 IST

पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेकडून मिळू लागले ३० रॅक

नागपूर : कोळशाच्या भीषण तुटवड्याचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रासाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वेकडे रिकाम्या रॅकची उपलब्धता वाढल्यामुळे कोळशाच्या आयातीत सुधारणा झाली आहे. पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.

महाजनकोचा दावा आहे की, गेल्या तीन दिवसात त्यांना सरासरी १ लाख ३५ हजार मेट्रिक टनाची आवक होत आहे. याशिवाय रस्ते मार्गाने दुर्गापूरवरून ६ हजार आणि भटाडी खाण येथून ८ हजार मेट्रिक टन कोळसा मिळू लागला आहे. गोडेगाव आणि इंदर खाणीतून कोराडी, खापरखेडा वीज केंद्राला ४ हजार मेट्रिक टन कोळसा मिळत आहे. परंतु महाजनकोच्या सूत्रांचा दावा आहे की, ही आवक सतत सुरु राहिल्यास समस्या सुटणार आहे. कंपनीसमोर वीज उत्पादन करणे आणि पावसाळ्यात स्टॉक तयार ठेवणे असे दुहेरी आव्हान आहे.

कोठे किती स्टॉक ?

केंद्र            किती दिवसांचा कोळसा

कोराडी            १.७५ दिवस

चंद्रपूर             ६ दिवस

खापरखेडा      ५.५ दिवस

नाशिक            १.५ दिवस

भुसावळ         १ दिवस

परळी             ५ दिवस

पारस             १.५ दिवस

चंद्रपुरात विक्रमी उत्पादन

भारनियमनाचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राने या दरम्यान विक्रमी उत्पादन केले आहे. येथील ७ युनिट गेल्या २३ दिवसांपासून सातत्याने उत्पादन करीत आहेत. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये संयंत्राच्या युनिटकडून सतत २१ दिवसापर्यंत उत्पादन करण्यात यश मिळविले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी यासाठी कौतुक केले आहे.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटGovernmentसरकारelectricityवीज