शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला कोळसा

By admin | Updated: May 14, 2016 02:54 IST

नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला.

अंबाडा शिवारातील विहीर : कोळसा खाण असल्याचे संकेतनरखेड/जलालखेडा : नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे या प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. परिणामी, या परिसरात कोळशाची खाण असल्याचे संकेत मिळत असून, याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दादाराव शंकरराव सोनारे रा. अंबाडा, ता. नरखेड यांनी त्यांच्या अंबाडा शिवारातील शेतात (सर्व्हे क्रमांक - २९०/१) मध्ये नुकतेच विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. सदर खोदकाम २१ फुटापर्यंत गेले असता, कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे सोनारे यांनी या प्रकाराची माहिती तलाठी राहुल राऊत यांच्यामार्फत नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर यांना दिली. निंबाळकर यांनी याची माहिती लगेच उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे यांना देत गुरुवारी दुपारी विहिरीची तसेच त्यातून काढण्यात आलेल्या कोळशाच्या नमुन्याची पाहणी केली. सोनारे यांनी सांगितले की विहिरीत २१ फुटावर कोळशाचा थर आढळून आला. हा थर एक फूट रुंद व सहा फूट लांब होता. त्यानंतर मजुरांनी २४ फुटापर्यंत खोदकाम केले. नंतर ते थांबविण्यात आले. या कोळशाचे थरावर माती टाकण्यात आली, असेही सोनारे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नरखेड तालुक्यातील मालापूर शिवारात बोअरवेलचे खोदकाम करताना कोळसा आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परिणामी,अंबाडा, सायवाडा, इंदरवाडा, रोहणा, कलंभा, गोंडीदिग्रस, मालापूर तसेच आंबाडा लगतच्या वर्धा जिल्ह्यात कोळशाच्या खाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच आ. डॉ. आशिष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांनी या शेताची पाहणी करून कोळशाचे नमुने घेतले. सदर नमुने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कातडे यांनी सांगितले. (तालुका/प्रतिनिधी)औद्योगिकीकरणाला भरपूर वावया विहिरीत आढळून आलेला हा कोळसा असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यास या भागात कोळशाची खाण आहे, हे सिद्ध होईल. त्यामुळे या भागाच्या औद्योगिकीकरणाला भरपूर वाव आहे. कोळसा खाण आणि औद्योगिकीकरण यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. खाणीसाठी वेकोलिने शेती अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल. पर्यायाने या भागात मोठे प्रकल्प उभे राहतील. शेतकरी सुखी होतील.- आ. डॉ. आशिष देशमुख, काटोल मतदारसंघ