शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

कोळसा संकट : राज्याने मागितली केंद्राला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:07 IST

कमल शर्मा नागपूर : कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे राज्यात विजेचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे मदत मागितली ...

कमल शर्मा

नागपूर : कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे राज्यात विजेचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील परिस्थिती समजावून सांगितली. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधून महाराष्ट्राला पुरेसा वीज पुरवठा करण्याची मागणीही केली.

राज्यातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा साठा अतिसंवेदनशील स्थितीत पोहोचला आहे. काही वीज केंद्रांमध्ये तर अर्धा दिवस पुरेल इतका आणि काहींमध्ये दाोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. कोळसा नसल्याने महाजेनकोचे चार युनिट ठप्प पडले आहेत. दररोज कोळशाच्या २५ रॅक ऐवजीशवकेवळ १८ रॅक मिळत आहेत. या गंभीर अवस्थेतही परिस्थती नियंत्रणात ठेवण्यात आली असल्याचा महाजेनकोचा दावा आहे. सूत्रांनुसार कोळशाचा पुरवठा वाढला नाही तर राज्यात पुन्हा एकदा लोडशेंडिंगचे संकट निर्माण होऊ शकते. नवरात्रसोबतच सण-उत्सवांना सुरुवात होईल तसेच ऑक्टोबर हीटमध्ये विजेची मागणी वाढते. यातच कोळशाचे संकट उभे ठाकले आहे. यातच आता कोळसा कंपन्यांनी महाजेनकाोकडे थकीत रकमेची मागणी केली आहे. सूत्रांनुसार थकबाकी वाढल्यामुळे कोळसा कंपन्यांची पुरवठा वाढवण्याची इच्छा नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एकूणच परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. महाराष्ट्रातील ही परिस्थती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली आहे.

महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना खाणींंमध्येही दिसला नाही कोळसा

दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या आदेशावर महाजेनकोचे अधिकारी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कोळसा खाणींवर पोहोचली. दुर्गापूर खाणीमध्ये गेलेल्या पथकाने सांगितले की, पाऊसामुळे येथील उत्खनन बंद आहे. कोळशाचा साठाही नाही. दुसरीकडे भटाडी खाणीमध्ये मातीमिश्रित कोळसा सापडला. त्याचप्रकारे सास्ती धोपटला खाणीमध्ये सुद्धा कोळसा आढळून आला नाही. यामुळे परस्थितीचे गांभीर्य दिसून येते. दरम्यान महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांनी कोल इंडियाच्या प्रबंध निदेशकांची भेट घेऊन पुरवठा वाढवण्याची मागणी केली. निधीच्या कमतरतेमुळे यावर्षी केवळ १८ एमएमटी कोळशाचा साठा होऊ शकला, असे महाजेनकोने स्पष्ट केले आहे.

देशव्यापी संकट

केंद्र सरकारने महाराष्ट्राला कळविले आहे की, कोळशाचे संकट केवळ महाराष्ट्रपुरते मर्यादित नाही तर देशव्यापी आहे. देशात १३६ औष्णिक वीज केंद्र आहेत. यात ५८ हे शून्य ते ३ दिवसाच्या साठ्यासह अतिसंवेदनशील स्थितीत आहेत. तर ७० वीज केंद्रात चार ते दहा दिवसाचाच साठा उपलब्ध आहे. येथेही स्थिती संवेदनशील अशीच आहे. असे असले तरी केंद्र सरकारने कोळसा पुरवठा वाढवण्याच्या दिशेने सकारात्मक पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.