शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2023 21:04 IST

Nagpur News रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

नागपूर : वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्याने राज्यावर वीज संकट ओढवण्याची शक्यता आहे. सातत्याने होत असलेल्या बैठकांमुळे महानिर्मिती, कोळसा कंपन्या व रेल्वेमध्ये समन्वय वाढला आहे. रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

राज्यातील नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीजकेंद्रात कोळशाचा नाममात्र साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या बडनेरा सेक्शनमध्ये थर्ड लाइनच्या बांधकामासाठी ब्लॉक घेतले जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांची गती मंदावली आहे. यामुळे नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीज केंद्रांना होणारा कोळसा पुरवठा प्रभावित झाला आहे. आता रेल्वे, कोळसा कंपनी व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर कोळसा पुरवठ्यात वाढ झाली आहे. आता दररोज ११ रॅकऐवजी १४ रॅक पुरवठा होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारली आहे. नाशिकमध्ये ४, भुसावळ १, पारस २ व परळी येथे ३.५ दिवस पुरेल, एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्यामुळे परिस्थिती संवेदनशील आहे.

चार युनिट बंद

- कोळसा संकटामुळे महानिर्मितीचे चार युनिट ठप्प झाले आहेत. यात कोराडी वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, ६ व ९, तसेच चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ६ चा समावेश आहे. गॅस टंचाईमुळे उरण प्रकल्पातील ३ युनिट बंद आहेत.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट