शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

देखभालअभावी कोचला सोडून गेले रेल्वे इंजिन

By admin | Updated: June 4, 2017 01:55 IST

रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे.

हावडा मेल घटनेचा अहवाल दपूम रेल्वेला सोपविलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे. तज्ज्ञांच्या मते याचे मुख्य कारण इंजिनची योग्य देखभाल न करणे हे आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी बल्लारशाजवळ राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन कोचला सोडून पुढे गेले होते. अशीच घटना शुक्रवारी हावडा मेलबाबत घडली. सालवा-चाचेर जवळ घडलेल्या या घटनेत अचानक मोठा आवाज होऊन रेल्वेगाडीचे कोच आणि इंजिनच्या मधील कपलिंग तुटले. त्यामुळे इंजिन पुढे निघून गेले आणि कोच मागे राहिले. त्यानंतर नवी कपलिंग लावून इंजिन कोचला जोडून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार हावडा मेलचे इंजिन दक्षिण पूर्व रेल्वेच्या संतरागाछी लोको शेडमधील होते. या इंजिनची योग्य देखभाल न केल्यामुळे कपलिंग तुटल्याची घटना घडली असावी असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या घटनेबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ही गंभीर घटना आहे. विभागातील सालवा-चाचेर येथे ही घटना घडली. या घटनेचा विभागीय स्तरावर प्राथमिक तपास करण्यात आला आहे. तपासात कपलिंग आणि इंजिनमध्ये त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. इंजिन संतरागाछी लोको शेडमधील असल्यामुळे तुटलेली कपलिंग, विभागीय तपासणीचा अहवाल दक्षिण पूर्व रेल्वेला सोपविण्यात आला आहे. आता या घटनेचे विश्लेषण करून दोषींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी दक्षिण पूर्व रेल्वेची असल्याचे त्यांनी सांगितले. दपूम रेल्वेच्या कार्यपद्धतीवर शंकातज्ज्ञांच्या मते रेल्वे बोर्डाचा नियम आहे की कोणत्याही गाडीचा प्रवास ३०० ते ३५० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर सुविधा असलेल्या रेल्वेस्थानकावर त्या गाडीचे ‘इन रुट एक्झामिनिशन’ करण्यात यावे. या नियमानुसार अपघात घडलेली हावडा मेलची यांत्रिक तपासणी रायपूर आणि बिलासपूर स्थानकावर व्हावयास हवी होती. रायपूरला गाडी १० मिनिट आणि बिलासपूरला १५ मिनिट थांबते. जर तेथे योग्यरीत्या यांत्रिक तपासणी केली असती तर कपलिंगची त्रुटी आढळून त्याची दुरुस्ती केल्या जाऊ शकली असती.