शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विदर्भ विकासात सहकारी बँकांची मोठी भूमिका

By admin | Updated: April 18, 2016 05:41 IST

सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून या माध्यमातून

नागपूर : सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते. विदर्भात या बँकांनी उल्लेखनीय काम केले असून, क्षेत्राच्या आर्थिक विकासात या बँकांची मोठी भूमिका राहणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे रविवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.लोकार्पणानंतर शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा खासदार विजय दर्डा हे होते. याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, विदर्भ अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक असोसिएशनचे अध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, अण्णाजी मेंडजोगे, गांधीबाग सहकारी बँकेचे अध्यक्ष रतनलाल लाहोटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, कार्यकारी समिती सदस्य बाबूराव तिडके हे प्रामुख्याने उपस्थित होते. बदलते आर्थिक चित्र लक्षात घेता व्याजदर कमी व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे. सहकारी बँकांचे ‘नेटवर्क’ चांगले आहे व त्यांच्याच प्रयत्नांमुळे सावकारांच्या मनमानीवर नियंत्रण आले आहे. सहकारी बँकांनी नक्कीच नफा कमविला पाहिजे. परंतु समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता समाजात उद्योजकतेचा विकास कसा होईल यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. येणारा काळ हा सहकारी संस्थांसाठी कठीण आहे. परंतु हे आव्हान स्वीकारून या संधीचे सोनेदेखील करता येऊ शकते. सहकारी संस्थांनी गरिबांना मदतीचा हात दिला तर जनतेचा विश्वास संपादन होऊ शकेल; शिवाय प्रगती करणाऱ्या संस्थांनी बुडणाऱ्या संस्थांना आधार दिला तर विदर्भात सहकार आणखी वाढेल. बँकांना वर आणण्यासाठी संबंधित कायद्यातदेखील काही बदल आवश्यक आहेत, असेदेखील गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)सहकारी बँकांनी ग्रामीण भागावर भर द्यावा४सहकारी बँकांचे जाळे सर्वात पहिले जर्मनीत विणले गेले. भारतात सहकाराची सुरुवात बडोदा येथून झाली व त्याचे श्रेय महाराष्ट्रातील लोकांनाच जाते. राज्यातील सहकार क्षेत्राने चांगला व वाईट दोन्ही काळ पाहिले आहेत. काही लोकांमुळे सहकारी क्षेत्राचे नाव खराबदेखील झाले. परंतु सहकारी बँकांनी आता मानसिकता बदलून हरहुन्नरी लोकांना कर्ज दिले पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गांधीबाग सहकारी बँकेने केलेली प्रगती ही इतरांसाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. ई-रिक्षांमुळे घटली दिल्लीतील गुन्हेगारी४दिल्लीमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यापासून तेथील गुन्हेगारीचा दर घटला आहे. पोट भरण्यासाठी जे लोक गुन्हे करायचे, ते आता ई-रिक्षा चालवून सन्मानाने जगत आहेत. खुद्द दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनीच ही बाब सांगितल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. लोकांना प्रामाणिकपणे जगण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. ई-रिक्षांप्रमाणेच इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकारी बँकांनी गरीब व प्रामाणिक तरुणांना मदतीचा हात द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.