शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ढगांनी राेखला सूर्याचा ताप ! विदर्भातील तापमान घसरले

By निशांत वानखेडे | Updated: April 26, 2025 19:02 IST

Nagpur : उष्ण लाटांपासून दिलासा

निशांत वानखेडेनागपूर : मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी माेठा दिलासा दिला. आकाश व्यापलेल्या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली  आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटले. उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला, पण वातावरणातील उष्ण वारे शरीराला झाेंबत राहिले.

मागील संपूर्ण आठवडा वैदर्भीयांसाठी तापदायक गेला. चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकाेला शहरांचा पारा ४५ पार जात जागतिक उष्ण शहरांच्या यादीत पाेहचला हाेता. नागपूरसह इतर शहरेही ४४ ते ४५ अंशाच्या दरम्यान पाेहचली हाेती. विदर्भात मुक्कामी असल्यासारखा सूर्याने उन्हाचा कहर केला. तापदायक वातावरणामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले.

दरम्यान हवामान विभागाने २७ एप्रिलपासून पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण हाेईल, असा अंदाज वर्तविला  हाेता. या अंदाजाच्या एक दिवसाच्या अगाेदरच ढगाळ वातावरण तयार झाले. शनिवारी सकाळी उन्ह तापले हाेते, पण दुपार हाेईपर्यंत वातावरण बदलत गेले आणि आकाशात ढगांची गर्दी झाली. या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली. त्यामुळे तापमान खाली आले. नागपूरला १.४ अंशाची घट हाेत पारा ४२.६ अंशावर पाेहचला. भयंकर तापलेल्या चंद्रपूरच्या तापमानात ३.४ अंशाची घसरण हाेत पारा ४२ अंशावर आला. मात्र जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचा ताप शनिवारीही कायम हाेता. येथे ४४.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले, जे विदर्भात सर्वाधिक राहिले.

इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे पारा १ ते २ अंशाने खाली आला. अकाेला ४३.९, अमरावती ४२.८, भंडारा ४१, गाेंदिया ४०.९, वर्धा ४२.६, यवतमाळ ४२.४ आणि वाशिमला ४१.४ अंशाची नाेंद झाली आहे.

एप्रिलचा शेवट, मे ची सुरुवात ‘ताप’मुक्तदरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सुरुवातीपासून आतापर्यंत उन्हाचा त्रास सहन करावा लागला असला तरी महिन्याचा शेवट मात्र तापमुक्त असणार आहे. पुढचे सर्व दिवस अवकाळीची स्थिती असून वीजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमीचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मे महिन्याचे सुरुवातीचे दिवसही हीच स्थिती असेल. त्यानंतर मात्र पारा पुन्हा चढेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामान अंदाजnagpurनागपूर